महाराष्ट्र

बारसूमध्ये पुन्हा एकदा पोलीस विरुद्ध आंदोलक; एकीकडे सर्वेक्षण तर दुसरीकडे आंदोलक आक्रमक

नवशक्ती Web Desk

बारसू येथे पुन्हा एकदा पोलीस विरुद्ध आंदोलक असे चित्र पाहायला मिळाले. आज दुपारी बारसूच्या माळरानावर सर्वेक्षण सुरु असताना ते थांबवण्यासाठी काही आंदोलक त्याठिकाणी दाखल झाले. हजारो आलेल्या या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. मात्र, भर उन्हामध्येही आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी काम बंद करण्यासाठी त्यांनी गोंधळ सुरु केला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बघता त्यांनी आंदोलकांना तिथून हटवण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी अश्रुधुरांचा वापर केला. पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यात तर यश आले. पण, भर उन्हामध्ये माळरानावर होत असलेल्या या आंदोलनामुळे अनेक आंदोलकांना त्रास होऊ लागला. अनेक गावकरी आंदोलक उष्णतेमुळे तिथेच जागेवर बसले. यावेळी अनेकांना चक्करदेखील आल्याचे समोर आले. तसेच, काही आंदोलकांनी, पोलिसांनी लाठीमार केल्याचादेखील आरोप केला. त्यामुळे हे आंदोलन आता चांगलेच चिघळले असून बारसूमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून शेतकऱ्यांशी कधीही चर्चा करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका; रेणुका शहाणेंची पोस्ट चर्चेत

मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी; म्हणाल्या...

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात ११ वाजेपर्यंत किती टक्के मतदान ? बघा संपूर्ण आकडेवारी

Lok Sabha Elections 2024:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये केले मतदान; तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात!

ईशा अंबानी, नताशा पुनावाला ते आलिया भट्ट ; 'मेट गाला २०२४' ला 'या' भारतीयांनी लावली हजेरी!