महाराष्ट्र

बारसूमध्ये पुन्हा एकदा पोलीस विरुद्ध आंदोलक; एकीकडे सर्वेक्षण तर दुसरीकडे आंदोलक आक्रमक

बारसू येथे माळरानावर सुरु असलेल्या रिफायनरी सर्वेक्षणच्या ठिकाणावर स्थानिक गावकऱ्यांनी येऊन आंदोलन सुरु केली, पोलिसांनी लाठीमार केल्याचा आंदोलकांचा आरोप

नवशक्ती Web Desk

बारसू येथे पुन्हा एकदा पोलीस विरुद्ध आंदोलक असे चित्र पाहायला मिळाले. आज दुपारी बारसूच्या माळरानावर सर्वेक्षण सुरु असताना ते थांबवण्यासाठी काही आंदोलक त्याठिकाणी दाखल झाले. हजारो आलेल्या या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. मात्र, भर उन्हामध्येही आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी काम बंद करण्यासाठी त्यांनी गोंधळ सुरु केला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बघता त्यांनी आंदोलकांना तिथून हटवण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी अश्रुधुरांचा वापर केला. पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यात तर यश आले. पण, भर उन्हामध्ये माळरानावर होत असलेल्या या आंदोलनामुळे अनेक आंदोलकांना त्रास होऊ लागला. अनेक गावकरी आंदोलक उष्णतेमुळे तिथेच जागेवर बसले. यावेळी अनेकांना चक्करदेखील आल्याचे समोर आले. तसेच, काही आंदोलकांनी, पोलिसांनी लाठीमार केल्याचादेखील आरोप केला. त्यामुळे हे आंदोलन आता चांगलेच चिघळले असून बारसूमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून शेतकऱ्यांशी कधीही चर्चा करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नवा प्राप्तिकर कायदा आजपासून लागू; करदात्यांना मोठा दिलासा

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्यातदारांना दिलासा; RoDTEP योजनेची मुदत सप्टेंबरपर्यंत वाढवली, वाचा सविस्तर

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी ३३ प्रश्नांची यादी प्रसिद्ध; स्थिर नातेसंबंधामधील जोडप्याला विवाहित जोडपे म्हणून गणले जाणार

Mumbai : 'फूल' बनू नका! १ एप्रिलनिमित्त पश्चिम रेल्वेची जनजागृती मोहीम; प्रवाशांना सुरक्षेचा संदेश

मुंबई महापालिकेत ‘महिलाराज’; महापौर, आयुक्त ते समिती अध्यक्षपदावर महिलांचेच वर्चस्व