महाराष्ट्र

बारसूमध्ये पुन्हा एकदा पोलीस विरुद्ध आंदोलक; एकीकडे सर्वेक्षण तर दुसरीकडे आंदोलक आक्रमक

बारसू येथे माळरानावर सुरु असलेल्या रिफायनरी सर्वेक्षणच्या ठिकाणावर स्थानिक गावकऱ्यांनी येऊन आंदोलन सुरु केली, पोलिसांनी लाठीमार केल्याचा आंदोलकांचा आरोप

नवशक्ती Web Desk

बारसू येथे पुन्हा एकदा पोलीस विरुद्ध आंदोलक असे चित्र पाहायला मिळाले. आज दुपारी बारसूच्या माळरानावर सर्वेक्षण सुरु असताना ते थांबवण्यासाठी काही आंदोलक त्याठिकाणी दाखल झाले. हजारो आलेल्या या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. मात्र, भर उन्हामध्येही आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी काम बंद करण्यासाठी त्यांनी गोंधळ सुरु केला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बघता त्यांनी आंदोलकांना तिथून हटवण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी अश्रुधुरांचा वापर केला. पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यात तर यश आले. पण, भर उन्हामध्ये माळरानावर होत असलेल्या या आंदोलनामुळे अनेक आंदोलकांना त्रास होऊ लागला. अनेक गावकरी आंदोलक उष्णतेमुळे तिथेच जागेवर बसले. यावेळी अनेकांना चक्करदेखील आल्याचे समोर आले. तसेच, काही आंदोलकांनी, पोलिसांनी लाठीमार केल्याचादेखील आरोप केला. त्यामुळे हे आंदोलन आता चांगलेच चिघळले असून बारसूमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून शेतकऱ्यांशी कधीही चर्चा करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Mumbai : चेंबूर बस दुर्घटनेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; अन्य चार विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

Mumbai : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळले; काही विद्यार्थी जखमी, बचावकार्य सुरू, Video

आता मोबाईल नंबरशिवाय करता येणार चॅट; WhatsApp चं नवं Username फीचर, जाणून घ्या डिटेल्स

सचिन अहिर यांनी पक्ष सोडताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले - "जे कधीच नव्हते आमचे...

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! सचिन अहिर यांचा शिंदे गटात प्रवेश, उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल