महाराष्ट्र

'तुरुंगात राहिल्याने राऊतांना...' नामर्द सरकार या टीकेवर भाजप आक्रमक

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला संजय राऊत यांच्यावर निशाणा

प्रतिनिधी

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका करत महाराष्ट्र सरकारला 'नामर्द सरकार' असे म्हंटले. यावरून आता भाजप आक्रमक झाली असून भाजपच्या नेत्यांनी त्यांवर टीका करत, त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे.

भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "मागील अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार होते. त्यावेळी त्यांनी का मर्दानगी दाखवली नाही? स्वत: आत्मचिंतन करून स्वत:ला उपमा देण्याचे काम तेच करू शकतात." तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "संजय राऊतांनी ही भाषा तुरुंगात राहल्याने इतर कैद्याकडून शिकली असावी. षंढ, नामर्द, आमदारांना रेडा म्हणणे, हा कदाचित इतर कैद्यांबरोबर राहल्याचा प्रभाव असू शकतो." अशी सणसणीत टीका त्यांनी केली. पुढे बावनकुळे म्हणाले की, "मंत्री बेळगावात गेले नाही म्हणून सरकार षंढ आहे, नामर्द आहे म्हणणं ही भाषा संजय राऊतांना शोभत नाही. मर्दानगी आणि सरकार चालवण्याची धमक शिंदे-फडणवीसांमध्ये आहे, हे राऊतांना माहिती आहे. प्रत्येक गोष्टीचे उत्तर हे सामाजिक वातावरण अशांत करून होत नाही

Mumbai : वडाळ्यात ट्रॅफिक बदल; 'हा' रस्ता २२ मेपर्यंत बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

'राजमाता जिजाऊ' बस सेवेचा शुभारंभ; ३,००० नव्या गाड्यांमुळे राज्यातील सार्वजनिक वाहतुकीला चालना

मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना; २८ मार्चला 'या' भागांत पाणीपुरवठा बंद, पाणी साठवण्याचे BMCचे आवाहन

रॅपर बादशाह दुसऱ्यांदा विवाहबंधनात; अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर Photo व्हायरल

Mumbai : विक्रोळी स्थानकात विनातिकीट प्रवाशांवर रेल्वेची धडक कारवाई; १ लाखांहून अधिक दंड वसूल