महाराष्ट्र

"मराठा-ओबीसींमध्ये वाद लावून भाजपला महाराष्ट्राचं मणिपूर करायचंय", नाना पटोलेंचा गंभीर आरोप

नवशक्ती Web Desk

जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी अमरण उपोषण सुरु केलं आहे. यानंतर राज्य सरकारने मराठवाड्यातील मरााठा समाजाला कुणबी दाखले देण्याबाबत शासन निर्णय जारी केला. यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याची लेखी विनंती केली. मात्र, सरसकट सर्वांना असा उल्लेख नसल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. अशात आता ओबीसी आरक्षणातून मराठा आरक्षण देण्याबाबत तर्क-विर्तक लढवलणं सुरु आहे. यावर कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केला आहे.

नाना पटोले म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीत भाजपने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं वचन दिलं होतं. ते त्यांना पाळता आलेलं नाही. मात्र, आम्ही केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यास आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढवून कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ, असं आश्वासन नाना पटोलेंनी दिलं आहे.

ते पुढे म्हणाले की, भाजपला जातनिहाय गणना करुन मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायचं नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणातुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाषा करुन ओबीसींना मराठ्यांविरुद्ध भडकवण्याचा भाजपचा प्रकार आहे. मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करुन भाजपला महाराष्ट्राचे मणिपूर करायचं आहे. असा गंभिर आरोप नाना पटोलेंनी केला आहे. यावेळी त्यांनी दोन्ही समाजातील जनतेला संयम बाळगण्याचं आवाहन देखील केलं आहे. यावेळी मराठ्यांना आरक्षण द्यायला जातनिहाय गणनेशिवाय पर्याय नाही. परंतु, भाजप त्याविरोधत असल्याचंही ते म्हणाले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त