महाराष्ट्र

छगन भुजबळांना राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेत - मनोज जरांगे-पाटील

नवशक्ती Web Desk

सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापताना दिसत आहे. राज्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र टिकणारं आरक्षण द्या, अशी मागणी ओबीसी नेते करताना दिसत आहे. अशात काल जालन्यातील अंबड येथे झालेल्या ओबीसींच्या महाएल्गार सभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. यानंतर जरांगे यांनी देखील भुजबळांवर आरोप केले आहेत.

इस्लामपूर येथील सभेत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. छगन भुजबळ यांनी केलेली वक्तव्य पाहता त्यांना राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेतस, असा आरोप केला. छगन भुजबळांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मराठा-ओबीसी एकमेकांच्या अंगावर जाऊ नये, ही राजकीय मंडळी आपल्यात झुंज लाऊ शकतात. त्यामुळे रावध रहा, असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलं आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हाययचं म्हणून जातीय दंगली करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावरुन अपेक्षा करतो की आत्ताचे मुख्यमंत्री लवकरात लवकर आरक्षण देतील टाईम बॉण्ड ही देतील. शिवाय मंत्री छगन भुजबळ यांना देखील समजावून सांगतील. उशिरा का होईना पाप बाहेर आलं आहे. दंगली घडवण्यासाठी वक्तव्य सुरु आहेत. वैचारिक विचार मांडले पाहिजे. तो माणूस ओबीसींसह मराठा समाजाच्या मनातून उतरला आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त