महाराष्ट्र

उल्हासनगरातील नागरिक काश्मीरमध्ये अडकले

व्हिडीओच्या माध्यमातून माहिती सोशल मीडियावर टाकली

नवशक्ती Web Desk

उल्हासनगर : श्रीनगर ते जम्मू-काश्मीर मुख्य रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. या ठिकाणी अमरनाथ यात्रेसाठी जाणारे उल्हासनगर शहरातील अनेक नागरिक अडकल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पांठ्यारी गुफेजवळ रस्ता खचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. उल्हासनगर शहरातील अनेक नागरिक हे अमरनाथ यात्रेला गेले आहेत. ते तेथे फसले असल्याची माहिती मिळत आहे. उल्हासनगरमधील प्रसिद्ध बालाजी ट्रॅव्हल्सचे मालक दीपक चंचलानी हे देखील तेथे अडकले आहेत, ते तेथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती सोशल मीडियावर टाकली आहे. तसेच सर्व नागरिक सुखरूप असल्याचे देखील त्यांनी व्हिडीओमध्ये नमूद केले आहे.

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज लढत आज; दुबईत रंगणार मैदानातील महायुद्ध

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाक सामन्यावरून राजकीय घमासान!

Ind Vs Pak Asia Cup : ''भारतासमोर खेळण्याशिवाय पर्याय नाही''; अखेर BCCI ने सांगितले कारण

भारत-पाकिस्तान सामना : शिवसेना ठाकरे गटाची महिला आघाडी रस्त्यावर; 'माझं कुंकू, माझा देश' आंदोलन, पंतप्रधान मोदींना पाठवलं 'सिंदूर'

९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ठरले; पानिपतकार विश्वास पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब