महाराष्ट्र

उल्हासनगरातील नागरिक काश्मीरमध्ये अडकले

व्हिडीओच्या माध्यमातून माहिती सोशल मीडियावर टाकली

नवशक्ती Web Desk

उल्हासनगर : श्रीनगर ते जम्मू-काश्मीर मुख्य रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. या ठिकाणी अमरनाथ यात्रेसाठी जाणारे उल्हासनगर शहरातील अनेक नागरिक अडकल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पांठ्यारी गुफेजवळ रस्ता खचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. उल्हासनगर शहरातील अनेक नागरिक हे अमरनाथ यात्रेला गेले आहेत. ते तेथे फसले असल्याची माहिती मिळत आहे. उल्हासनगरमधील प्रसिद्ध बालाजी ट्रॅव्हल्सचे मालक दीपक चंचलानी हे देखील तेथे अडकले आहेत, ते तेथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती सोशल मीडियावर टाकली आहे. तसेच सर्व नागरिक सुखरूप असल्याचे देखील त्यांनी व्हिडीओमध्ये नमूद केले आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन