महाराष्ट्र

इर्शाळगड दुर्घटनेतील १९ मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वीकारले

नीलम गोर्‍हे या सकाळी इर्शाळवाडीत आल्या होत्या. यावेळी त्यांनी अपघातातील जखमींशी संवाद साधला

नवशक्ती Web Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळगड दुर्घटनेतील १९ मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे. या मुलांच्या शिक्षणाचा खर्च स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उचलणार आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे यांनी स्वतः ही माहिती दिली. त्यामुळे या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटणार आहे. तसेच या वेळी नीलम गोर्‍हे यांनी अपघातातून वाचलेल्या मुलांचे सर्वेक्षण झाले असून आता महिलांचे सर्वेक्षण करावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या.

नीलम गोर्‍हे या सकाळी इर्शाळवाडीत आल्या होत्या. यावेळी त्यांनी अपघातातील जखमींशी संवाद साधला. त्यांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. यावेळी ते लोकांना तातडीने मदत देत आहेत का? तसेच सर्व बालके व महिलांना आवश्यक सुविधा पुरविल्या जातात का? असे विचारले. या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Navi Mumbai : हापूस आंबा झाला स्वस्त; APMCमध्ये दरात घट, १५००रुपयांपासून पेटी उपलब्ध

Mumbai : ४०० टन वजनी क्रेन उलटली; BKC मध्ये मेट्रो कामादरम्यान मोठा अपघात

पुण्यातील वरिष्ठ शास्त्रज्ञाला 'डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात ओढले; सायबर चोरट्यांनी तब्बल ७८ लाख रुपये लुटले

"मुलगा माझ्यासारखा दिसत नाही..."; पत्नीवरील संशयामुळे पित्यानेच घेतला सहा वर्षीय मुलाचा जीव; चौकशीत धक्कादायक खुलासा

वेदांता पॉवर प्लांट स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मॅनेजमेंटविरूद्ध FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी