महाराष्ट्र

इर्शाळगड दुर्घटनेतील १९ मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वीकारले

नीलम गोर्‍हे या सकाळी इर्शाळवाडीत आल्या होत्या. यावेळी त्यांनी अपघातातील जखमींशी संवाद साधला

नवशक्ती Web Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळगड दुर्घटनेतील १९ मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे. या मुलांच्या शिक्षणाचा खर्च स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उचलणार आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे यांनी स्वतः ही माहिती दिली. त्यामुळे या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटणार आहे. तसेच या वेळी नीलम गोर्‍हे यांनी अपघातातून वाचलेल्या मुलांचे सर्वेक्षण झाले असून आता महिलांचे सर्वेक्षण करावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या.

नीलम गोर्‍हे या सकाळी इर्शाळवाडीत आल्या होत्या. यावेळी त्यांनी अपघातातील जखमींशी संवाद साधला. त्यांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. यावेळी ते लोकांना तातडीने मदत देत आहेत का? तसेच सर्व बालके व महिलांना आवश्यक सुविधा पुरविल्या जातात का? असे विचारले. या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

राज्य धर्मस्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; राज्यात कायदा लागू, बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्यांना १० वर्षांपर्यंतचा कारावास

मुंबई ते वाढवण प्रवास वेगवान! उत्तन-विरार सी लिंक आता दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस महामार्गाला जोडण्यास मंजुरी

CSMT वर स्मार्ट डिजिटल डिस्प्ले प्रणाली; गाडीची अद्ययावत माहिती एका नजरेत उपलब्ध

Mumbai : पाणीकपात कायम; १०० टक्के पाणीसाठ्यासाठी आणखी सव्वा लाख दशलक्ष लिटरची गरज

Mumbai : दादरमध्ये चेंबरची संरक्षक ग्रील लंपास; अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल