उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांचे संग्रहित छायाचित्र एक्स (@richapintoi)
महाराष्ट्र

…म्हणून 'आप' महाराष्ट्राच्या निवडणुकीत नाही; मविआने जागा देऊ केल्याचा भारद्वाज यांचा दावा

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पक्षाला जागा दिल्याबद्दल आप नेत्याने आभार मानले आहेत.

Swapnil S

मुंबई : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा करणाऱ्या आपचे नेते आणि दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी, हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी घडलेला प्रकार टाळण्यासाठी पाऊल उचलल्याचे सांगितले. विरोधकांना पडणाऱ्या मतांचे विभाजन टाळून भाजपचा पराभव करणे हे पक्षाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही भारद्वाज म्हणाले.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पक्षाला जागा दिल्याबद्दल आप नेत्याने आभार मानले आहेत. ते म्हणाले की, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आम्हाला जागा देऊ केली, हे त्यांचे औदार्य आहे. मात्र हा जागांसाठी निवडणूक लढवण्याचा विषय नाही. भाजपचा पराभव करणे हे महत्त्वाचे आहे.

ते म्हणाले की, आपने कोणत्याही प्रकारची स्पर्धा टाळली पाहिजे. अन्यथा, हरियाणाप्रमाणे, विरोधी पक्षांच्या विभाजनामुळे, भाजप पुन्हा सत्तेवर येईल आणि अरविंद केजरीवाल यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही महाराष्ट्रात इंडिया आघाडीला जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.

आपने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. मविआत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांचा समावेश आहे. तर महायुती म्हणून ओळखले जाणाऱ्या सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व भाजप करत असून त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा समावेश आहे.

हरियाणा निवडणुकीत भाजपने ९० पैकी ४८ जागांवर विजय मिळवून सरकार स्थापन केले. काँग्रेसला ३७ जागा तर तीन जागा अपक्ष आणि दोन जागा इंडियन नॅशनल लोकदलाला मिळाल्या.

INS Udaygiri: ‘उदयगिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात; स्वीकृती दस्तावेजावर स्वाक्षरी, बघा काय आहे खासियत?

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलवादी? विधानसभेत आमदार मनीषा कायंदे काय म्हणाल्या? बघा Video

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी; प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पालिका करणार हायकोर्टात अर्ज

पुण्यातील नद्यांच्या पूररेषा नव्याने आखाव्यात; ४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Dombivli : ''घरी कोणीही नाही, फाशी घे''...तरुणीचा WhatsApp मेसेज अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; गुन्हा दाखल