डोंबिवली स्फोट fpj
महाराष्ट्र

"इन्स्पेक्शन असलं की ते शटर बंद करून...", अमुदान कंपनीवर शेजारच्या कंपनी मालकांचे गंभीर आरोप

अमुदान कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा साठा ठेवला होता. त्याचं योग्य प्रकारे निरीक्षण होत नव्हतं, असा आरोप अमुदान कंपनीच्या शेजारील कंपनीच्या मालकांनी केला आहे.

Suraj Sakunde

मुंबई: डोंबिवलीतील MIDC मधील अमुदान कंपनीत आज दुपारी १ः३० वाजताच्या सुमारास स्फोट होऊन ६ जणांचा मृत्यू झाला, तर ४८ जण जखमी झाले आहेत. या आग दुर्घटनेमुळं अमुदान कंपनीच्या शेजारच्या कंपन्यांचंही मोठं नुकसान झालं. दरम्यान, अमुदान कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा साठा ठेवला होता. त्याचं योग्य प्रकारे निरीक्षण होत नव्हतं, असा आरोप अमुदान कंपनीच्या शेजारील कंपनीच्या मालकांनी केला आहे.

त्याला कळलं इन्स्पेक्शन आहे की तो शटर बंद करून द्यायचा...

अमुदान कंपनीच्या शेजारी असलेल्या कंपनीचे मालक डॉ. शेवडे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, "माझ्या कंपनीचं नेमकं किती नुकसान झालंय, हे सध्या मला कळत नाहीये. कारण आम्हाला आत जाता येत नाहीये. परंतु मी आधी दोनदा त्यांना सांगितलं होतं. तो दुसरीकडची फॅक्टरी बंद करून इकडे आला होता तेव्हा त्याला इथं कंपनी सुरू करू देऊ नका, असं आम्ही सांगितलं होतं. हे धोकादायक आहे. इथं पूर्वीही एकदा अशी घटना होती. तशी परत घडू शकते. फॅक्टरी इस्पेक्टरनी नेमकं काय केलं? अध्यक्षांनी काय केलं? माझा काही दोष नसताना, आज मी माझं नुकसान करून बसलोय. मी काय करायचं आता? त्याला कळलं इन्स्पेक्शन आहे की तो शटर बंद करून द्यायचा. "

उदय सामंत आणि श्रीकांत शिंदेंची घटनास्थळी भेट-

डोंबवली आग दुर्घटनेची माहिती मिळतात उद्योग मंत्री उदय सामंत आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. उदय सामंत म्हणाले की, "बॉयलरचा स्फोट होऊन आग लागल्याची प्राथमिक आहे. मी स्वतः तिथं जाऊन आलोय. यावरती तात्पुरता उपाय काढून उपयोग नाही. इथल्या केमिकल कंपन्या स्थलांतरित करायच्या आहेत, त्याचाही धोरणात्मक निर्णय झाला आहे. जखमींचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. आपण यावर कायमस्वरूपी उपाय काढलेला आहे. परंतु दुर्दैवानं ती प्रक्रिया होण्यापूर्वीच ही घटना घडली. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल."

"ज्यांना स्वतःच्या आई-वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते..."; मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

Mumbai : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याने शिवाजी पार्क परिसरात तणाव; ठाकरे गट संतप्त, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला

Mumbai : २० सप्टेंबरपासून मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद; MMRDA चा निर्णय

जपानमधून ‘टायफून’ क्षेपणास्त्र हटवा! चीनची अमेरिकेकडे मागणी

राज्यातील सर्व न्यायालये कार्यरत आहेत का? खासदार, आमदारांविरोधातील खटल्यांबाबत हायकोर्टाने सरकारला फटकारले