महाराष्ट्र

पावसाचा दहावी, बारावी पुरवणी परीक्षेला फटका; वेळापत्रकात बदल

राज्यातील काही भागात २६ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येत असलेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेला पावसाचा फटका बसला आहे. राज्यातील काही भागात २६ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

राज्य शिक्षण मंडळामार्फत जुलै, ऑगस्टमध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) १६ जुलै ते ८ ऑगस्ट आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षा १६ जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये २६ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे २६ जुलै रोजी होणाऱ्या दहावी परीक्षेचे पेपर ३१ जुलै रोजी व बारावी परीक्षेचे पेपर ९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेले आहेत.

दहावी परीक्षा-

२६ जुलै रोजीची सकाळ सत्रातील विज्ञान तंत्रज्ञान भाग - २ ची परीक्षा ३१ जुलै रोजी त्याच सत्रात घेण्यात येणार आहे.

बारावी परीक्षा-

२६ जुलै रोजीची सकाळ सत्रात वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान, एमसीवी, सी, पेपर २ आता ९ ऑगस्ट रोजी त्याच वेळेत घेण्यात येणार आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी

Ganeshotsav 2026 : मुंबईकरांना घरबसल्या मिळणार उकडीचे अन् तळलेले मोदक; BMC च्या महिला बचत गटांचा खास उपक्रम

व्यापारासाठी नौकानयनाचे स्वातंत्र्य महत्त्वाचे - पंतप्रधान नरेंद्र मोदी