महाराष्ट्र

‘बेकायदेशीर’ सरकार घरी बसविण्याची जनतेत भावना – बाळासाहेब थोरात

लोकसभेच्या विजयाने महाराष्ट्रात चैतन्याचे वातावरण आहे. राज्यातील बेकायदेशीर सरकार घरी बसवण्याची जनतेची भावना आहे, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

Swapnil S

मुंबई : लोकसभेच्या विजयाने महाराष्ट्रात चैतन्याचे वातावरण आहे. राज्यातील बेकायदेशीर सरकार घरी बसवण्याची जनतेची भावना आहे, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

भाजपच्या १० वर्षांच्या मनमानीला जनतेने लोकसभा निवडणुकीत उत्तर दिले आहे. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत वाढला आहे. महाराष्ट्राने संसदेत वाघिणी पाठवल्या आहेत. या महिला खासदार भाजप सरकारला धारेवर धरत आहेत. लोकसभेतील राहुल गांधी यांच्या पहिल्याच भाषणाने ५६ इंचाच्या छातीला धडकी भरली. लोकसभा निवडणुकीत बहुमत जाताच नरेंद्र मोदी यांना धर्मनिरिपेक्षतेची आठवण झाली आहे.

‘पन्नास खोके, एकदम ओके’ हे जनता अजून विसरलेली नाही. महायुती सरकारचे घोटाळे उघड करताना महाविकास आघाडी सरकारने पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली हे सांगा. मविआच्या चांगल्या कामांची माहिती जनतेला सांगा, असे ते म्हणाले.

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील रहेजा रेसिडेन्सीला भीषण आग; ६ वर्षांच्या चिमूरडीसह ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, प्रदूषणात होतेय वाढ, AQI १६४ वर पोहोचला

समुद्रकिनारे धोक्यात! CRZ ‘बफर झोन’ ५०० वरून २०० मीटर करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव, पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा इशारा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे