महाराष्ट्र

‘बेकायदेशीर’ सरकार घरी बसविण्याची जनतेत भावना – बाळासाहेब थोरात

लोकसभेच्या विजयाने महाराष्ट्रात चैतन्याचे वातावरण आहे. राज्यातील बेकायदेशीर सरकार घरी बसवण्याची जनतेची भावना आहे, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

Swapnil S

मुंबई : लोकसभेच्या विजयाने महाराष्ट्रात चैतन्याचे वातावरण आहे. राज्यातील बेकायदेशीर सरकार घरी बसवण्याची जनतेची भावना आहे, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

भाजपच्या १० वर्षांच्या मनमानीला जनतेने लोकसभा निवडणुकीत उत्तर दिले आहे. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत वाढला आहे. महाराष्ट्राने संसदेत वाघिणी पाठवल्या आहेत. या महिला खासदार भाजप सरकारला धारेवर धरत आहेत. लोकसभेतील राहुल गांधी यांच्या पहिल्याच भाषणाने ५६ इंचाच्या छातीला धडकी भरली. लोकसभा निवडणुकीत बहुमत जाताच नरेंद्र मोदी यांना धर्मनिरिपेक्षतेची आठवण झाली आहे.

‘पन्नास खोके, एकदम ओके’ हे जनता अजून विसरलेली नाही. महायुती सरकारचे घोटाळे उघड करताना महाविकास आघाडी सरकारने पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली हे सांगा. मविआच्या चांगल्या कामांची माहिती जनतेला सांगा, असे ते म्हणाले.

Mumbai : प्रवाशांची होणार गैरसोय; उद्या पश्चिम व मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Iran vs US-Israel War: तेल पुरवठ्यात अस्थिरता; इराणने अमेरिकेचा दावा फेटाळला

Mumbai : धक्कादायक! वृद्धाश्रमात ज्येष्ठ महिलेला झाडूने मारहाण; Video व्हायरल होताच संतापाची लाट

Mumbai : उद्धव ठाकरे यांच्याकडून एक्सपोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक्स कोर्सचा शुभारंभ; काय आहे खास? फी किती? जाणून घ्या

Iran vs US-Israel War: पत्नीशी फोनवर बोलताना मोठा स्फोट! सौदीतील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू