महाराष्ट्र

‘बेकायदेशीर’ सरकार घरी बसविण्याची जनतेत भावना – बाळासाहेब थोरात

लोकसभेच्या विजयाने महाराष्ट्रात चैतन्याचे वातावरण आहे. राज्यातील बेकायदेशीर सरकार घरी बसवण्याची जनतेची भावना आहे, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

Swapnil S

मुंबई : लोकसभेच्या विजयाने महाराष्ट्रात चैतन्याचे वातावरण आहे. राज्यातील बेकायदेशीर सरकार घरी बसवण्याची जनतेची भावना आहे, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

भाजपच्या १० वर्षांच्या मनमानीला जनतेने लोकसभा निवडणुकीत उत्तर दिले आहे. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत वाढला आहे. महाराष्ट्राने संसदेत वाघिणी पाठवल्या आहेत. या महिला खासदार भाजप सरकारला धारेवर धरत आहेत. लोकसभेतील राहुल गांधी यांच्या पहिल्याच भाषणाने ५६ इंचाच्या छातीला धडकी भरली. लोकसभा निवडणुकीत बहुमत जाताच नरेंद्र मोदी यांना धर्मनिरिपेक्षतेची आठवण झाली आहे.

‘पन्नास खोके, एकदम ओके’ हे जनता अजून विसरलेली नाही. महायुती सरकारचे घोटाळे उघड करताना महाविकास आघाडी सरकारने पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली हे सांगा. मविआच्या चांगल्या कामांची माहिती जनतेला सांगा, असे ते म्हणाले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री