प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

चंद्रपुरातील तलावात पाच जणांचा बुडून मृत्यू; मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चार जण

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाला आहे. पर्यटनासाठी गेलेल्या या मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

Swapnil S

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाला आहे. पर्यटनासाठी गेलेल्या या मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे हे पाच तरुण रहिवाशी आहेत. गावातील पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

मृतांची नावे जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे, तेजस ठाकरे आहे. मुलांनी घोडाझरी तलावावर पर्यटनाचा आनंद घेतला. त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास सहा मुले पोहण्यासाठी तलावात उतरली. आर्यन हेमराज हा मुलगा कसाबसा वाचला. परंतु जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे ही पाचही मुले तलावात बुडाली. बुडालेल्या पाच जणांमध्ये दोन सख्खे भाऊ आहेत. दोन चुलत भाऊ आहेत. हे चार जण गावंडे कुटुंबातील आहेत, तर एका मित्राच समावेश आहे.

केंद्राच्या तात्पुरत्या बंदीनंतर प्ले स्टोअरवर Telegram पुन्हा सुरू; पण ॲप स्टोअरवरून अजूनही गायब

Lucknow Fire : लग्नाचं स्वप्न झालं भस्मसात! जिथे प्रेम फुललं, तिथेच जोडप्याचा अंत, लखनऊ अग्निकांडमधील मन सुन्न करणारी घटना

Delhi Crime : फुटपाथवर झोपलेल्या ११ वर्षीय मुलीचे अपहरण; लैंगिक अत्याचारानंतर हत्या, कॅब चालक जेरबंद!

Ulhasnagar : २०० हून अधिक आधारकार्ड कचऱ्यात

Mumbai : ‘ओसी’ नसलेल्या इमारतींना दिलासा; ८०० चौरस फुटांपर्यंत सदनिका असलेल्या इमारतींना मिळणार OC, राज्य सरकारची मंजुरी