महाराष्ट्र

बालगृहातून बाहेर पडणाऱ्या अनाथ मुलांना पुढील शिक्षण मोफत

Swapnil S

मुंबई : बालगृहातून बाहेर पडणाऱ्या अनाथ मुला-मुलींसाठी पुढील शिक्षण राज्य सरकारतर्फे मोफत देण्यात येईल, असा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन कॅबिनेटमध्ये मांडला व या विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तो मंजूर करून घेतला. या निर्णयामुळे बालगृहातून बाहेर पडणाऱ्या संस्थात्मक आणि संस्थाबाह्य मुलांसाठी पुढील शिक्षण मोफत असणार आहे. या निर्णयाचे राज्यामध्ये सर्व स्तरांमध्ये स्वागत केले जात आहे.

मागील ६ वर्षांपासून बालगृहातून बाहेर पडणाऱ्या अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या व त्यांच्यासाठी संघर्ष करणाऱ्या तर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष व भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनीदेखील राज्य सरकारच्या या संवेदनशील निर्णयाचे स्वागत केले आणि त्यांचे आभार मानले आहे. हा निर्णय अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या कित्येक सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. हजारो नवयुवक दरवर्षी अनाथालयातून बाहेर पडतात. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा दिवस आहे.

मागील कित्येक वर्षांपासून बालगृहातून बाहेर पडणारा प्रत्येक मुलगा या निर्णयाची वाट पाहत होता. या मुलांना फक्त शिक्षण हवे आहे. पण जर १८ वर्षांपर्यंत बालगृहामध्ये मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकार घेत असेल तर १८ वर्षानंतर बालगृहातून बाहेर पडणाऱ्या मुलांची जबाबदारी सरकार का घेऊ शकत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन हा निर्णय कॅबिनेटमध्ये मांडला व मंजूर करून घेतला.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा