महाराष्ट्र

धक्कादायक! बारावीत ८७ टक्के गुण, तरीही केली आत्महत्या... कमी टक्केवारी मिळाल्यानं विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

बारावीमध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळणार अशी तिला खात्री होती, परंतु ८७ टक्के गुण मिळाले अन्...

Swapnil S

विशेष प्रतिनिधी

मुंबई: भाईंदर पूर्वेला नर्मदा नगर परिसरातील सागर सम्राट इमारती मध्ये राहणाऱ्या अनुष्का कबसुरी (वय १७ वर्ष) या बारावीच्या विदयार्थिनीने बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं राहत्या घरात पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बारावीमध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळणार अशी तिला खात्री होती, परंतु ८७ टक्के गुण मिळाल्याने तिने आत्महत्या केली आहे.

मृत विद्यार्थिनी मालाडच्या सराफ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून गुण मिळाल्यानं तिला धक्का बसल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

Mumbai : आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेसाठी कडेकोट बंदोबस्त; १००० हून अधिक पोलिस तैनात, पार्थिव नेणारे वाहन फुलांनी सजवले

Mumbai : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दादरमध्ये ट्रॅफिक निर्बंध; कोणते रस्ते बंद? जाणून घ्या सविस्तर

Thane : कल्याण-मुरबाड मार्गावर भीषण अपघात; इको व्हॅन-सिमेंट मिक्सर धडकेत ११ जणांचा मृत्यू, वाहनाचा चक्काचूर

Mumbai : बनावट MGL कर्मचाऱ्याचा भांडाफोड; भांडुपमध्ये नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला, VIDEO

Mumbai : आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी; शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार, VIDEO