महाराष्ट्र

धक्कादायक! बारावीत ८७ टक्के गुण, तरीही केली आत्महत्या... कमी टक्केवारी मिळाल्यानं विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

बारावीमध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळणार अशी तिला खात्री होती, परंतु ८७ टक्के गुण मिळाले अन्...

Swapnil S

विशेष प्रतिनिधी

मुंबई: भाईंदर पूर्वेला नर्मदा नगर परिसरातील सागर सम्राट इमारती मध्ये राहणाऱ्या अनुष्का कबसुरी (वय १७ वर्ष) या बारावीच्या विदयार्थिनीने बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं राहत्या घरात पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बारावीमध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळणार अशी तिला खात्री होती, परंतु ८७ टक्के गुण मिळाल्याने तिने आत्महत्या केली आहे.

मृत विद्यार्थिनी मालाडच्या सराफ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून गुण मिळाल्यानं तिला धक्का बसल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

“यापुढे एकनाथ शिंदेंवर टीका झाली, तर..." ; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजनांचा ठाकरे बंधूंना इशारा

बांगलादेशातील हिंसाचारावर भारत आक्रमक; परराष्ट्र मंत्रालयाकडून कारवाईची मागणी, "अल्पसंख्याकांच्या विरोधातील शत्रुत्व...

पुण्याच्या राजकारणात मोठी घडामोड! प्रशांत जगताप यांनी धरला काँग्रेसचा 'हात', पक्षाची ताकद वाढणार?

अवघ्या १० वर्षांच्या श्रवण सिंगला राष्ट्रपतींच्या हस्ते 'प्रधानमंत्री बाल पुरस्कार'; म्हणाला, "मला स्वप्नातदेखील...

"रुग्णालयानेच त्याला मारले": कॅनडामधील भारतीय व्यक्तीच्या पत्नीने सांगितला ८ तासांचा भयावह अनुभव