महाराष्ट्र

धक्कादायक! बारावीत ८७ टक्के गुण, तरीही केली आत्महत्या... कमी टक्केवारी मिळाल्यानं विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

बारावीमध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळणार अशी तिला खात्री होती, परंतु ८७ टक्के गुण मिळाले अन्...

Swapnil S

विशेष प्रतिनिधी

मुंबई: भाईंदर पूर्वेला नर्मदा नगर परिसरातील सागर सम्राट इमारती मध्ये राहणाऱ्या अनुष्का कबसुरी (वय १७ वर्ष) या बारावीच्या विदयार्थिनीने बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं राहत्या घरात पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बारावीमध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळणार अशी तिला खात्री होती, परंतु ८७ टक्के गुण मिळाल्याने तिने आत्महत्या केली आहे.

मृत विद्यार्थिनी मालाडच्या सराफ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून गुण मिळाल्यानं तिला धक्का बसल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा