महाराष्ट्र

महाविकास आघाडीला उच्च न्यायालयाचा धक्का ; देशमुख, मलिक यांची याचिका फेटाळली

विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक, एक दिवसाचा जामीन मंजूर करण्याची मागणी देशमुख-मलिक यांनी याचिका दाखल केली होती.

वृत्तसंस्था

महाविकास आघाडीमधील दोन महत्वाचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी येत्या 20 जून रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी तात्पुरता जामीन मिळावा अशी याचिका करण्यात आली होती. हि याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

सोमवारी उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर मलिक यांनी नवीन याचिका दाखल केली होती. मलिक यांनी 20 जूनच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी तुरुंगातून बाहेर येण्यास मुभा मिळावी अशी ती याचिका होती.

शहापूर : खालापूरच्या धर्तीवर खुटघर इंटरचेंजचा विकास; मंत्रालय स्तरावर घडामोडी सुरू

पूरग्रस्तांना मदतीचा हात! राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

''हा खटला दिल्लीत का चालवायचा?'' समीर वानखेडेंना न्यायालयाचा सवाल, शाहरुख खान विरोधातील याचिकेवर सुनावणी

लडाखमधील हिंसाचारानंतर सोनम वांगचुक CBI च्या रडारवर; NGO ची चौकशी सुरू, संस्थेचा परवाना रद्द

मराठा समाज बांधवांना तूर्तास दिलासा; हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार