महाराष्ट्र

जामनेरमधील स्थिती पूर्वपदावर; तरुणाच्या मृत्यूप्रकरणी एसआयटी चौकशी?

जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील सुलेमान रहिमखान पठाण (२१) या तरुणाच्या जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर काही दिवस तणावग्रस्त झालेली जामनेरची परिस्थिती आता पूर्वपदावर आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Swapnil S

जळगाव : जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील सुलेमान रहिमखान पठाण (२१) या तरुणाच्या जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर काही दिवस तणावग्रस्त झालेली जामनेरची परिस्थिती आता पूर्वपदावर आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

११ ऑगस्ट रोजी सुलेमान एका मुलीसोबत बसलेला असताना, संशयावरून काही जणांनी त्याला जबर मारहाण केली. जखमी अवस्थेत त्याला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी सुलेमानच्या वडिलांनी १० ते १५ जणांविरोधात फिर्याद दाखल केली. घटनेनंतर जामनेर शहरात तणाव निर्माण झाला. काहींनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला आणि दुकाने बंद ठेवली. परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी दाखल होऊन कार्यवाही सुरू केली. आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल.

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग