Kolhapur : दुचाकी आणि टेम्पोची भीषण धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत  
महाराष्ट्र

Kolhapur : दुचाकी आणि टेम्पोची भीषण धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत झाला.

Swapnil S

कोल्हापूर : जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत झाला. दुचाकी आणि टेम्पोची धडक झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याने हसते खेळते कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाले आहे. या अपघातामध्ये दीपक चांदे (३९), त्यांची पत्नी शोभा ( ३५) त्यांची दोन मुले जय (१०) आणि मुलगी पूर्वा ( ७) यांचा जागीच मृत्यू झाला.

चांदे कुटुंबीय वास्तव्यास मुंबईत आहे. मात्र, सुट्टीचा महिना असल्याने गावी आले होते. दीपक चांदे यांनी मुंबईत मेहनत करत आजरा तालुक्यातील व्होन्याळी गावात घर बांधले होते. सुट्टी संपत आल्याने मुंबईकडे शुक्रवारी मुंबईला रवाना होण्यापूर्वी पाहुण्यांच्या भेटीसाठी ते दुंडगे गावी जात होते. मात्र, आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत अवघ्या कुटुंबाचा जागीच अंत झाला.

...तर कंत्राटदारांवर थेट कारवाई! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा; पायाभूत सुविधांचे प्रकल्प साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश

FDA चे २०३ आस्थापनांवर छापे, १०२ जणांना अटक; तुकाराम मुंढे यांची अवैध गुटखा व भेसळीविरोधात कारवाई

कोकण रेल्वेची जुलैपासून रत्नागिरी ते जेएनपीटी थेट कंटेनर रेल्वे सेवा

महायुतीचे सहा बिनविरोध, ठाकरे गटाला फटका; विधान परिषद अर्जमाघारीचा टप्पा संपला, ११ जागांवर युती वि.आघाडी थेट लढत

आजवर १८ लाख रोपे दिली भेट; सुधाकर देशमुख नावाच्या वृक्षमित्राची कहाणी