महाराष्ट्र

मध्यपूर्व संघर्षानंतर महाराष्ट्र सरकारकडून व्हॉट्सॲप हेल्पलाइन सुरू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, "नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य...

वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मत त्यांनी सोशल मिडियाद्वारे व्यक्त केले.

किशोरी घायवट-उबाळे

गल्फ प्रदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची सुरक्षा हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी (दि. ३) सांगितले. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मत त्यांनी सोशल मिडियाद्वारे व्यक्त केले.

सतत संपर्क आणि मार्गदर्शन

सुनेत्रा पवार यांनी एक्स (X) वर माहिती शेअर करत म्हटले की, संबंधित एजन्सींमार्फत नागरिकांशी सतत संपर्क साधला जात आहे. प्रभावित नागरिकांना त्वरीत मदत देण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्य यंत्रणा सतत लक्ष ठेवत आहे

उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, राज्य यंत्रणा घटनांवर बारकाईने लक्ष ठेवत आहे आणि संबंधित अधिकार्‍यांशी समन्वय साधून आवश्यक मदत वेळेत पोहोचेल याची काळजी घेत आहे.

खास व्हॉट्सॲप हेल्पलाइन

त्वरीत मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दुबईस्थित इंडियन पीपल्स फोरम (Indian People’s Forum) च्या सहकार्याने खास व्हॉट्सॲप हेल्पलाइन सुरू केली आहे.

व्हॉट्सॲप हेल्पलाइन नंबर: +97150 365 4357

ही हेल्पलाइन अडचणीत असलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना थेट संपर्क साधण्याची सोय उपलब्ध करून देईल, ज्यामुळे अधिकारी त्वरीत प्रतिसाद देऊ शकतील.

Bihar : श्रावणी सोमवारी मोठी दुर्घटना! अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी; ७ महिला भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी; VIDEO

Mumbai : बाप्पाच्या विसर्जनापूर्वी खड्डेमुक्त रस्ते होणार; महापौरांचे समन्वय समितीला आश्वासन

वाहतूककोंडीवर ‘स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट’चा पायलट प्रोजेक्ट; गुगल मॅप्सवर कोंडी दिसताच उल्हासनगर वाहतूक पोलिसांची घटनास्थळी धाव

वसईत आजपासून तीन वाढीव न्यायालये कार्यान्वित; आणखी पाच-सहा कंटेनर कोर्ट सुरू करण्यासाठी प्रयत्न

दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये नेणार; मंत्री आशिष शेलार यांची घोषणा