महाराष्ट्र

महाराष्ट्र निवासी डॉक्टरांचा संप मागे ; मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय

निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला महाराष्ट्र निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याशी आज संपकरी निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने मागण्यांबाबत चर्चा केली. या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, निवासी डॉक्टरांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत.

वसतिगृहासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनापूर्वी मला भेटा असेही मी त्यांना सांगितले होते, बैठक आधी झाली असती तर हा प्रश्न निर्माण झाला नसता, असेही गिरीश महाजन म्हणाले. निवासी डॉक्टरांचे प्रतिनिधी डॉ.अविनाश दहिफळे यांनी सांगितले की, आज आमच्यात सकारात्मक चर्चा झाली. आम्ही संप मागे घेत आहोत. निवासी डॉक्टरांचा संप आता मागे घेण्यात आला आहे. आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी मार्डने प्रशासन आणि सरकारसमोर आपल्या मागण्या मांडताना संपावर जाण्याची धमकी दिली होती. सरकारने ३१ जानेवारीपर्यंत चर्चा करून मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली होती. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी २ जानेवारीपासून संप पुकारला होता.निवासी डॉक्टरांच्या संपामुळे राज्यातील सरकारी रुग्णालयातील रुग्णांचे हाल होत होते. राज्य सरकारशी आज चर्चा न झाल्यास बुधवारपासून संपावर जाण्याचा इशारा आपत्कालीन विभागातील कर्तव्यावर असलेल्या निवासी डॉक्टरांनी दिला होता.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Navi Mumbai : महापालिका पदभरती निकालाचा मार्ग मोकळा; संवर्गाचे स्कोअर कार्ड संकेतस्थळावर होणार जाहीर

Thane : खारफुटीतील भराव तात्काळ थांबवा! पोलीस आयुक्तांना NGT चा दणका, जिल्हाधिकाऱ्यांनाही फटकारले

Ulhasnagar : 'मी आमदार आहे, नगरसेवकाला विचारण्याची गरज नाही'; गोलमैदानातील विकासकामावरून आयलानी-पांडे आमनेसामने

Thane : गणेशोत्सवात अवजड वाहनांना 'नो एंट्री' विसर्जनाच्या पाच दिवसांत शहरात प्रवेशबंदी