महाराष्ट्र

महाविकास आघाडी ४० जागा जिंकेल -संजय राऊत यांचा दावा

राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन होताच अयोध्येत जाऊन १ कोटी रूपयांची देणारा शिवसेना हा पहिला पक्ष आहे.

Swapnil S

मुंबई : भाजप लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्याचा दावा करत असला तरी तो  हवेत राहणारा पक्ष असून तो जनतेचा पक्ष नाही. तो दोन पक्षांच्या कुबड्यांवर उभा आहे. त्यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी महाराष्ट्रात ४० हून अधिक जागा जिंकेल. एवढ्या जागा जिंकण्याची आमची क्षमता आहे, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या सर्वेक्षणातून महाराष्ट्रात महायुतीला १९ ते २१ जागा तर महाविकास आघाडीला २६ ते २८ जागा मिळवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘‘आम्ही जी तयारी केली आहे, ती पाहता किमान ३५ ते ४० जागा लोकसभेच्या जिंकू, एवढ्या जागा जिंकण्याची आमची क्षमता आहे. आम्ही सर्व्हे करत नाही पण आमचे ४० प्लस हे मिशन नसून आत्मविश्वास असल्याचे राऊत यांनी सांगितले.

भाजप प्रत्येकवेळा रामलल्लाच्या नावाने मते मागतात. जणू राममंदिराची मालकी यांच्याकडेच आहे. अशापद्धतीने त्यांचे राजकारण सुरु आहे. राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन होताच अयोध्येत जाऊन १ कोटी रूपयांची देणारा शिवसेना हा पहिला पक्ष आहे. त्यामुळे रामलल्ला हे कोणाच्या मालकीचे नाहीत. अयोद्धेचा सातबारा रामाच्या नावावर आहे, भाजपच्या नावावर नाही, असे सांगतानाच भारतीय जनता पक्षाने फेरफार करुन आपले नाव टाकले आहे का?, असा सवालही त्यांनी केला. रामलल्ला कोणाची खासगी संपत्ती नसून  देशाची अस्मिता आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

आंबेडकर इंडिया आघाडीत येतील
काँग्रेसचा स्थापना दिवस असल्याने २८ डिसेंबरपर्यंत काँग्रेसचे नेते व्यस्त आहेत. त्यामुळे वंचितचा महाविकास आघाडी तसेच इंडिया आघाडीमध्ये समावेश करण्याबाबत २८ डिसेंबरनंतर निर्णायक बैठक होईल. या बैठकीत शंभर टक्के निर्णय होईल. प्रकाश आंबेडकर आणि आमची चर्चा सुरू आहे. त्यांच्या आणि आमच्या भूमिकेत कोणताच फरक नाही.  या देशामध्ये संविधान टिकावे. लोकशाहीची हत्या होऊ नये. कायदा पायदळी तुडवला जाऊ नये. तसेच मोदींची  हुकूमशाही संपवावी आणि लोकशाही मार्गाने संपवावी, असे मानणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत, असेही राऊत म्हणाले.

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित

PMLA प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; ED कडून प्रकरणांचा तपशील मागवला

ठाण्यात आस्थापनांची परवाना नूतनीकरणाकडे पाठ; परवाना विभागाकडून मागील १८ महिन्यांत १,१८२ नोटिसा, अवघ्या ४३४ चे नूतनीकरण

साखर कारखान्यांना ७३८ कोटींचे व्याज अनुदान; सहकारी साखर कारखान्यांसाठी सुलभ कर्ज योजना, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mumbai : शंख-शिंपल्यांपासून साकारली ९.५ फुटांची इको-फ्रेंडली गणेशमूर्ती; मालाडच्या श्री साई दर्शन मित्रमंडळाचे १७ व्या वर्षात पदार्पण