महाराष्ट्र

"...तर त्यांना लगेच फोन करतो किंवा उचलतो", मनोज जरांगेंनी सांगितलं गिरीश महाजन यांचा फोन न उचलण्याचं कारण

मंगळवारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन केला होता. परंतु, जरांगे पाटील यांनी महाजनांचा फोन उचलला नसल्याचं सांगितलं जात आहे.

नवशक्ती Web Desk

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी दिलेली ४० दिवसांची मुदत मंगळवारी(२४ ऑक्टोबर) रोजी संपली आहे. त्यामुळे जरांगे यांनी आता राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, मंगळवारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन केला होता. परंतु, जरांगे पाटील यांनी महाजनांचा फोन उचलला नसल्याचं सांगितलं जात आहे. आता जरांगे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

काही वेळापूर्व मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले. मी माझ्या आंदोलनाच्या निर्णयावर ठाम आहे. काही वेळाने पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका मांडेन, तसंच आंदोलनाची पुढली दिशा सर्वांना सांगेल. मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करेल. परंतु, ते आंदोलन सरकारला पेलवणार नाही.

यावेळी जरांगे यांनी गिरीश महाजन यांनी केलेल्या फोन बाबत विचारले असता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, त्यांच्याकडे आरक्षणाबाबतचं पत्र नसणार, शासनाने काढलेला जीआर तर नसणारचं नसणार. त्यांनी फोन केला त्यावेळी माझा फोन मित्राकडे होता. मी लोकांमध्ये होतो. नंतर मित्राने सांगितल्यावर मी परत गिरीश महाजन यांना फोन केला. परंतु, त्यांनी उचलला नाही. तसंच त्यांच्याकडून परत फोन आला नाही. ते पुढे म्हणाले की, ते कायदा पारित केला म्हणून सांगणार आहेत का? तसं असेल तर लगेच फोन उचलतो किंवा करतो.

Iran War Impact : मध्यपूर्वेतील संघर्षातही देशात LPG पुरवठा सुरळीत; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या जाहीर, पाहा वेळापत्रक

आखाती संघर्षाचा मच्छीमारांना फटका; 'बल्क कन्झ्युमर' वर्गीकरणामुळे संताप; डिझेल दरवाढीने मासेमारी व्यवसाय ठप्प

माथेरान 'मिनी ट्रेन'च्या फेऱ्या घटल्याने पर्यटक नाराज; 'मोटारकार' सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी

Mumbai : सिग्नलवरील मुलांसाठी आशेचा किरण! चेंबूरमध्ये 'सिग्नल स्कूल'ची सुरुवात, महापौरांच्या हस्ते उद्घाटन