महाराष्ट्र

मराठा समाजाला EWSमधून आरक्षण घेतल्यास जास्त फायदा होईल; प्रवीण गायकवाड यांचं मत

मराठा समाजाला ओबीसमध्ये आल्यास आरक्षणाचा खुपच कमी वाटा मराठा समाजाला मिळले असा मुद्दा प्रवीण गायकवाड यांनी मांडला आहे.

नवशक्ती Web Desk

राज्यातील मराठा समाजाला ओबीसींधून आरक्षण देण्याच्या मागणीवरुन राज्यात वातावरण तापलं असताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी मराठा समाजाला महत्वाचं आवहान केलं आहे. राज्यातील मराठा समाजानं ओबीसीऐवजी ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घेतलं तर अधिक फायदा होईल, असं प्रवीण गायकवाड यांनी म्हटलं आहे. सध्या ओबीसींना मिळणाऱ्या आरक्षणापैकी १८ ते १९ टक्के वाटा कुणबी समाज उचलतो. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसमध्ये आल्यास आरक्षणाचा खुपच कमी वाटा मराठा समाजाला मिळले असा मुद्दा प्रवीण गायकवाड यांनी मांडला आहे.

ते म्हणाले की, आर्थिक निकषावर मिळणाऱ्या १० टक्के आरक्षणापैकी ८ ते १० टक्के वाटा हा मराठा समाजाच्या वाट्याला येत असल्याचं दिसतंय. आर्थिक असमानता आरक्षण मागण्याचं मुळ आहे, असं गायकवाड म्हणाले. आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सरकारने धोरणात बदल करण्याची गरज आहेस असं ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीला मोठा प्रतिसाद देखील मिळाल्याच दिसत आहे. असं असताना. ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. यावरुन मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये वाद-प्रतिवाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मराठा समुदायाने आर्थिकदृष्ट्या मागास घटकातून आरक्षण घेण्याची भूमिका मांडली आहे.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली