महाराष्ट्र

मराठवाड्यात पावसाचे दुर्भिक्ष- परभणीत ३६ टक्के तूट

नांदेडमध्ये सरासरी ४७१.५ मीमी पाउस पडतो

नवशक्ती Web Desk

औरंगाबाद: राज्याच्या परभणी जिल्ह्यात पावसाची यंदा पावसाची तूट ३६.४ टक्क्यांवर पोहोचली आहे. परभणी जिल्हा मराठवाडा भागात मोडतो. मराठवाडा भागात औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोलनी, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड हे जिल्हे देखील येतात. यंदा नांदेड वगळता यापैकी अन्य कोणत्याही जिल्ह्यात पुरेसा पाउस पडलेला नाही. १ जून पासून परभणी जिल्ह्यात ६३.६ टक्के पाउस पडला आहे. येथे ४३०.६ मीमी पाउस पडणे अपेक्षित आहे. पण यंदा केवळ २७३.९ मीमी पाउसच पडला आहे. जालना जिल्ह्यात २५४.१ मीमी म्हणजे ७३.४ टक्के पाउस झाला आहे. तेथे पावसाची तूट २३.६ टक्के आहे. तसेच औरंगाबाद येथे २३.२ टक्के तर बीड जिल्ह्यात १८.४ टक्के तूट आहे. तसेच हिंगोलीत ८.२ टक्के तूट नोंदली आहे. केवळ नांदेड जिल्ह्यात २३.१ टक्के ज्यादा पाउस झाला आहे. तेथे १ जून पासून ५८०.६ मीमी पाउस पडला आहे. नांदेडमध्ये सरासरी ४७१.५ मीमी पाउस पडतो.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत