महाराष्ट्र

मराठवाड्यात पावसाचे दुर्भिक्ष- परभणीत ३६ टक्के तूट

नांदेडमध्ये सरासरी ४७१.५ मीमी पाउस पडतो

नवशक्ती Web Desk

औरंगाबाद: राज्याच्या परभणी जिल्ह्यात पावसाची यंदा पावसाची तूट ३६.४ टक्क्यांवर पोहोचली आहे. परभणी जिल्हा मराठवाडा भागात मोडतो. मराठवाडा भागात औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोलनी, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड हे जिल्हे देखील येतात. यंदा नांदेड वगळता यापैकी अन्य कोणत्याही जिल्ह्यात पुरेसा पाउस पडलेला नाही. १ जून पासून परभणी जिल्ह्यात ६३.६ टक्के पाउस पडला आहे. येथे ४३०.६ मीमी पाउस पडणे अपेक्षित आहे. पण यंदा केवळ २७३.९ मीमी पाउसच पडला आहे. जालना जिल्ह्यात २५४.१ मीमी म्हणजे ७३.४ टक्के पाउस झाला आहे. तेथे पावसाची तूट २३.६ टक्के आहे. तसेच औरंगाबाद येथे २३.२ टक्के तर बीड जिल्ह्यात १८.४ टक्के तूट आहे. तसेच हिंगोलीत ८.२ टक्के तूट नोंदली आहे. केवळ नांदेड जिल्ह्यात २३.१ टक्के ज्यादा पाउस झाला आहे. तेथे १ जून पासून ५८०.६ मीमी पाउस पडला आहे. नांदेडमध्ये सरासरी ४७१.५ मीमी पाउस पडतो.

१० एप्रिलपासून टोलवर कॅश बंद! FASTag-यूपीआय अनिवार्य; काय आहेत नवे नियम? जाणून घ्या

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकाचे A4 गेट तात्पुरते बंद; कधी होणार सुरू? जाणून घ्या वेळ

Thane : अंधश्रद्धेचा गैरफायदा! 'काळ्या जादूचा प्रभाव दूर करतो' म्हणत कुटुंबाला १.६६ कोटींचा गंडा

ठाणे महापालिकेचा महसूल १,९०९ कोटींवर; करवसुलीत आघाडी कायम

ठाण्यात घर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी; १७ एप्रिलपासून MCHIचे प्रॉपर्टी प्रदर्शन