महाराष्ट्र

नोंदणीकृत एजंट ५० हजारांवर; महाराष्ट्रात महारेराचे सर्वाधिक एजंट

महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी नुकताच ५० हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर स्थावर संपदा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एजंटच्या संख्येनेही महाराष्ट्रात ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यात राज्यातील एजंटसह देशाच्या विविध राज्याच्या प्रमुख शहरातील एजंटचाही समावेश आहे. सव्वाशे ते दीडशे महत्त्वाच्या शहरातील हे एजंट आहेत.

Swapnil S

मुंबई : महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी नुकताच ५० हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर स्थावर संपदा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एजंटच्या संख्येनेही महाराष्ट्रात ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यात राज्यातील एजंटसह देशाच्या विविध राज्याच्या प्रमुख शहरातील एजंटचाही समावेश आहे. सव्वाशे ते दीडशे महत्त्वाच्या शहरातील हे एजंट आहेत.

गृहनिर्माण प्रकल्पांप्रमाणेच नोंदणीकृत एजंटची संख्याही महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. सध्या महारेराकडे ५० हजार ६७४३ एजंट नोंदणीकृत आहेत. पैकी ३१ हजार ९८० एजंट सक्रिय असून १८,६९३ एजंटची नोंदणी विविध कारणास्तव महारेराने रद्द केली आहे.

यात मुंबई महानगरचा समावेश असलेल्या कोकणात २१ हजार ५० असे सर्वाधिक एजंट आहेत. त्यानंतर पुणे परिसरात ८,२०५, नागपूर परिसरात १,५०४, उत्तर महाराष्ट्रात ४९०, छत्रपती संभाजीनगर परिसरात ३४३ आणि अमरावती परिसरात २३७ एजंट नोंदणीकृत आहेत.

१८ हजार ६९३ पैकी काहींनी हे प्रमाणपत्र प्राप्त केले नाही आणि काहींनी त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण केले नाही म्हणून त्यांची नोंदणी रद्द करण्यात आलेली आहे.

स्थावर संपदा क्षेत्रातील 'एजंट' हा घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटच्या संपर्कात येतात. माहितीच्या आधारे ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात. ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवून महारेराने प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : निवडणुकांमध्ये बाजी कोणाची? कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?

"तेच मशीन, तीच सेटिंग अन् तोच पैसा..." निवडणुकांच्या निकालावर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

"आज माझ्या एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू..." विजयानंतर निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

Thane : अवैध बांधकाम केल्यास नगरसेवक पद जाणार; निवडणुकीपूर्वी उमेदवारांना द्यावे लागणार शपथपत्र

आता टोल नाक्यांवर AI; जाता येणार ८०च्या वेगाने; थांबण्याची, ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी