विधान परिषद निवडणुकीत रेश्मा काळेंच्या माघारीसाठी हालचाली; जळगावचा पेच सुटण्याबाबत गिरीश महाजन आशावादी संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

विधान परिषद निवडणुकीत रेश्मा काळेंच्या माघारीसाठी हालचाली; जळगावचा पेच सुटण्याबाबत गिरीश महाजन आशावादी

विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत नाशिकमधील तिढा सुटल्यानंतर जळगावमधील राजकीय पेचही लवकरच सुटेल, असा विश्वास राज्याचे मंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

Swapnil S

जळगाव : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत नाशिकमधील तिढा सुटल्यानंतर जळगावमधील राजकीय पेचही लवकरच सुटेल, असा विश्वास राज्याचे मंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार गीते यांनी उमेदवारी मागे घेतल्याने तेथील प्रश्न निकाली निघाला असून, जळगावमधील तिढाही उद्यापर्यंत सुटेल, अशी अपेक्षा त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. महायुतीत नाशिकची जागा शिवसेनेला (शिंदे गट) मिळाल्यानंतर भाजपचे बंडखोर उमेदवार गीते यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी गुरुवारी उमेदवारी मागे घेत शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. दुसरीकडे, जळगावमध्ये जागा भाजपच्या वाट्याला आली असतानाही शिवसेनेच्या (शिंदे गट) नगरसेविका रेश्मा काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून महायुतीसमोर पेच निर्माण केला आहे.

रेश्मा काळे यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असले, तरी त्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक पातळीवर त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा आणि कार्यकर्त्यांमधील नाराजी ही भाजपसाठी चिंतेची बाब ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, गिरीश महाजन गुरुवारी जळगाव दौऱ्यावर आले असता खासदार, आमदार, भाजप पदाधिकारी तसेच शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांची एका हॉटेलमध्ये बैठक झाली. दरम्यान, आपल्या मुलाला उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असल्याची चर्चा असलेल्या मंत्री गुलाबराव पाटील यांची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जळगावमधील तिढा सोडविण्यासाठी त्यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले असून, महायुतीतील पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

नाशिकचा प्रश्न सुटल्यानंतर जळगावमध्ये रेश्मा काळे यांनी माघार घेण्यास कोणतीही अडचण नाही. आज मंत्री गुलाबराव पाटील जळगावात नसल्यामुळे उद्या यासंदर्भातील निर्णय जाहीर होईल. रेश्मा काळे यांच्या माघारीबाबत आम्ही आशावादी आहोत. अपक्ष उमेदवार अनिल चौधरी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे हे देखील संपर्कात असून, ते महायुतीला पाठिंबा देऊ शकतात.
गिरीश महाजन, आमदार भाजप

डिझेल विक्रीवर मर्यादा! दिवसाला मिळणार केवळ २०० लिटर

Latur : सरकारने बैल दिला की थट्टा केली? औत लावताच आजारी बैलाने मान टाकली, लातूरच्या शेतकऱ्याची नव्या बैलाची मागणी

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री; कायदेशीर लढाईत विशेष सरकारी वकील म्हणून झाली नियुक्ती, बड्या नेत्यांचे धाबे दणाणले

Solapur : शेअर मार्केटच्या नादाने वाताहात; कर्जबाजारी मुख्याध्यापकाची कुटुंबासह आत्महत्या

नाशिक टीसीएस प्रकरणात ‘इस्लाम पार्टी’ची एन्ट्री; न्यायालयात दिला वकील, संशयितांना पुरवली जात आहे कायदेशीर मदत