एक्स @harshsapkal
महाराष्ट्र

काँग्रेसची ८ मार्चपासून सद्भावना पदयात्र; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती

राज्यात जातीयवाद, दोन समाजात दुजाभाव निर्माण केला जात आहे. याला विरोध करत बंधुभाव व सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी व महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी सद्भावनेची गरज आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यात जातीयवाद, दोन समाजात दुजाभाव निर्माण केला जात आहे. याला विरोध करत बंधुभाव व सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी व महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी सद्भावनेची गरज आहे. म्हणून काँग्रेस पक्षाने ८ मार्चपासून सद्भावना पदयात्रेचे आयोजन केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. टिळक भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, इंग्रजांना देशातून बाहेर काढताना केवळ राजकीय स्वातंत्र्यच नाही तर व्यवस्था परिवर्तनाचा महत्त्वाचा भाग होता. सपकाळ म्हणाले की, स्वातंत्र्याच्या आधीपासून असलेल्या काँग्रेस पक्षाच्या डीएनएमध्येच समाजवाद आहे. जाती भेदाच्या पलिकडे पाहण्याचा वारसा काँग्रेस पक्षाला लाभलेला आहे. सामाजिक सद्भावनेचा तोच वारसा संविधानातही आलेला आहे.

मुंबईकरांना करदिलासा? BMC चा अर्थसंकल्प आज सादर होणार

Mumbai : राणीबागेत लवकरच गुजरातच्या सिंहाची गर्जना; सिंहाच्या मागणीसाठी मुंबईच्या महापौरांचे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यातील औद्योगिक आस्थापनांना दिलासा; MPCB कडून संमतीपत्र मंजुरी, नुतनीकरणाचा कालावधी ५० टक्क्यांनी कमी

मुंबईतील हजारांहून अधिक बांधकामांना 'काम बंद'ची नोटीस; पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पर्यावरण राज्यमंत्र्यांची कारवाई

यंदा कर्मचाऱ्यांना ९.१ टक्के सरासरी वेतनवाढ मिळणार; सर्वेक्षणाचा अंदाज