महाराष्ट्र

Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ढाल-तलवार कुठे गेली? संजय राऊतांची टीका

प्रतिनिधी

काल महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या बेळगावमध्ये एका टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. (Sanjay Raut) यानंतर आता महाराष्ट्र कर्नाटकमधील सीमावाद चांगलाच पेटला आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत टीका म्हणाले की, 'ज्या सरकारला महाराष्ट्राच्या सीमेचे रक्षण करता येत नाही, त्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ढाल तलवार कुठे गेली?' असा सवाल केला.

खासदार संजय राऊत माध्यमांशी सवांद साधताना म्हणाले की, "कर्नाटकातील मराठी भाषिकांवर अन्याय होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तोंडाला कुलूप लावून का बसले आहेत? मुख्यमंत्री शिंदेंच्या पक्षाला ढाल तलवार ऐवजी कुलूप हीच निशाणी दिली पाहिजे. हे सरकार नामर्दच आहे." पुढे केंद्रावर आरोप करताना म्हणाले की, "ज्या पद्धतीने सीमाभागांमध्ये सरकारी प्रेरणेने जे काही सुरु आहे. कर्नाटकात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपचं सरकार आहे, हे लक्षात घ्या. ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील वाहानांची तोडफोड होत आहे. तर, दुसरीकडे, प्रतिकार करणारे आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून अटक करुन तुरुंगात डांबले जात आहे."

'काँग्रेस'चा संपत्तीच्या फेरवाटपाचा घातक खेळ

प्रचार अर्थपूर्ण व्हायचा तर...

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा