महाराष्ट्र

‘शालार्थ आयडी’ घोटाळा : ५४० शिक्षकांची भ्रष्ट मार्गाने भरती

राज्यातील ५४० शिक्षकांची भ्रष्ट मार्गाने भरती झाली आहे, असा ठपका ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) ठेवला आहे. सरकारी प्रक्रिया न राबवता शिक्षकांची भरती केल्याचे आढळले आहे.

Swapnil S

नागपूर : राज्यातील ५४० शिक्षकांची भ्रष्ट मार्गाने भरती झाली आहे, असा ठपका ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) ठेवला आहे. सरकारी प्रक्रिया न राबवता शिक्षकांची भरती केल्याचे आढळले आहे. हा घोटाळा १०० कोटी रुपयांचा आहे, असेही एसआयटीने सांगितले.

‘शालार्थ’ हे राज्य सरकारचे मध्यवर्ती पोर्टल आहे. यात सरकारी अनुदानित शाळेच्या कर्मचाऱ्यांची माहिती त्यात असते. ६२२ शिक्षकांची नियुक्ती झाली. त्यातील केवळ ७५ शिक्षकांची नियुक्ती प्रक्रियेनुसार झाली. ५४७ शिक्षकांची नेमणूक बनावट आयडीने करण्यात आली. त्यासाठी २० ते ३० लाख रुपये घेण्यात आले, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष तपास पथकाच्या प्रभारी सुनीता मेश्राम म्हणाल्या

की, शिक्षण विभागातील उपसंचालकांव्यतिरिक्त, तपास शिक्षण अधिकारी आणि शिक्षकांवर लक्ष आहे.

एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या त्या वेळच्या सगळ्या आमदारांना अपात्र करा; सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

मराठवाड्यात दाटले दुष्काळाचे ढग; ११ मोठ्या धरणांमध्ये ६९ टक्के पाणीसाठा

Mumbai : तीन वर्षांत एसी लोकलची तयारी; आयसीएफ १२०, आरसीएफ ७१, एमसीएफ ४७ रेक तयार करणार

महापौरांच्या पत्रामुळे नव्या वादाला तोंड; शैक्षणिक सल्लागाराच्या नियुक्तीसाठी शिक्षण समिती अध्यक्षांना पत्र

व्यावहारिक मराठी येत नसलेल्या ६६४ चालकांना नोटिसा; ३० सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम, ३,९९५ वाहनचालकांची तपासणी