महाराष्ट्र

‘शालार्थ आयडी’ घोटाळा : ५४० शिक्षकांची भ्रष्ट मार्गाने भरती

राज्यातील ५४० शिक्षकांची भ्रष्ट मार्गाने भरती झाली आहे, असा ठपका ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) ठेवला आहे. सरकारी प्रक्रिया न राबवता शिक्षकांची भरती केल्याचे आढळले आहे.

Swapnil S

नागपूर : राज्यातील ५४० शिक्षकांची भ्रष्ट मार्गाने भरती झाली आहे, असा ठपका ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) ठेवला आहे. सरकारी प्रक्रिया न राबवता शिक्षकांची भरती केल्याचे आढळले आहे. हा घोटाळा १०० कोटी रुपयांचा आहे, असेही एसआयटीने सांगितले.

‘शालार्थ’ हे राज्य सरकारचे मध्यवर्ती पोर्टल आहे. यात सरकारी अनुदानित शाळेच्या कर्मचाऱ्यांची माहिती त्यात असते. ६२२ शिक्षकांची नियुक्ती झाली. त्यातील केवळ ७५ शिक्षकांची नियुक्ती प्रक्रियेनुसार झाली. ५४७ शिक्षकांची नेमणूक बनावट आयडीने करण्यात आली. त्यासाठी २० ते ३० लाख रुपये घेण्यात आले, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष तपास पथकाच्या प्रभारी सुनीता मेश्राम म्हणाल्या

की, शिक्षण विभागातील उपसंचालकांव्यतिरिक्त, तपास शिक्षण अधिकारी आणि शिक्षकांवर लक्ष आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video