साखर निर्यातीवरील बंदी योग्यच; उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब 
महाराष्ट्र

साखर निर्यातीवरील बंदी योग्यच; उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

साखरेचा देशांतर्गत पुरवठा आणि किंमत नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यातीवर घातलेली बंदी योग्यच असल्याचा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने निर्यातदारांना मोठा धक्का दिला.

Swapnil S

मुंबई : साखरेचा देशांतर्गत पुरवठा आणि किंमत नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यातीवर घातलेली बंदी योग्यच असल्याचा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने निर्यातदारांना मोठा धक्का दिला. सार्वजनिक आणि राष्ट्रीय हित लक्षात घेऊन सरकारने घेतलेला धोरणात्मक निर्णय न्यायमूर्ती सुमन श्याम आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने वैध ठरवला आणि निर्यातदारांच्या सर्व याचिका फेटाळल्या.

केंद्र सरकारच्या परकीय व्यापार महासंचालनालयाने १३ मे रोजी अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेद्वारे साखरेची निर्यात ‘निर्बंधित’ श्रेणीतून थेट ‘प्रतिबंधित’ श्रेणीत टाकण्यात आली होती. या निर्णयामुळे साखर निर्यातीवर पूर्णपणे बंदी आली. या निर्णयाविरोधात ‘प्रीमियम शुगर्स’ आणि इतर व्यापारी कंपन्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.


(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : पालिका रुग्णालयांतील नियमित OPD सेवा बंद; आजपासून रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता, निवासी डॉक्टरांचा आंदोलनाचा इशारा

साकीनाका मॅनहोल दुर्घटना प्रकरण : कंत्राटदाराचे घूमजाव; कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ९९ रुपयांत बसपास; सर्व देणी देईपर्यंत सुविधा लागू, ७ ऑगस्ट रोजी बेस्टच्या वर्धापनदिनी होणार वाटप

'गुंगी गुडिया'वरून काँग्रेस-राष्ट्रवादीत घमासान; काँग्रेस कार्यालयात घुसून अजित पवार गटाची घोषणाबाजी

समाजकारण, राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला; डॉ. डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली