महाराष्ट्र

सध्याचे सरकार फारच रडके! मनोज जरांगेंचा हल्लाबोल

सध्याचे सरकार फारच रडके आहे. एवढे रडके सरकार मी केव्हाच पाहिले नव्हते. देवेंद्र फडणवीस फारच हुशार व राजकारणातील चाणक्य आहेत असे वाटायचे, पण ते फक्त फोडाफोडीतच हुशार असल्याचे दिसून येते, अशी टीका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी केली.

Swapnil S

जालना : सध्याचे सरकार फारच रडके आहे. एवढे रडके सरकार मी केव्हाच पाहिले नव्हते. देवेंद्र फडणवीस फारच हुशार व राजकारणातील चाणक्य आहेत असे वाटायचे, पण ते फक्त फोडाफोडीतच हुशार असल्याचे दिसून येते, अशी टीका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी केली.

अंतरवाली सराटीत जरांगे-पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी आरक्षण रद्द करण्यासंबंधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका कथित विधानासह मराठा आरक्षणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली.

‘आम्ही गोरगरीब लोकांसाठी संघर्ष करत आहोत, तर काही ठिकाणी फडणवीस यांच्या निर्देशांनुसार सरकारी आंदोलने सुरू आहेत. मात्र समाज हुशार आहे, तो सर्वकाही पाहत आहे. फडणवीस यांच्या जीवावर मस्ती करणाऱ्यांचे दिवस भरलेत. समाज त्यांचा हिशोब करील. राजकीय पक्षाला बाप मानणारे असे किती आले आणि गेले, भाजपही संपेल. भाजप आमदार प्रसाद लाड थोड्याच दिवसात वेडे होणार, असा टोलाही त्यांनी लगावला.

महायुती सरकारने सगेसोयऱ्याची अधिसूचना काढली, पण तिची अंमलबजावणी केली नाही. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची ग्वाही देऊनही ते मागे घेतले नाहीत, बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना नोकऱ्या दिल्या नाहीत, शिंदे समितीला मुदतवाढ दिली असतानाही ही समिती काम करत नाही, मराठ्यांचे ‘ईडब्लूएस’ रद्द का केले? अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी महायुती सरकारवर यावेळी केली.

ठाण्यात मंगळवारपासून १२ दिवस २०% पाणी कपात; न्युटिक गेट दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा कमी, बघा पाणी शटडाऊन वेळापत्रक

महाराष्ट्र सदन घोटाळा : मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता; ACBनंतर आता EDच्या प्रकरणातही दिलासा

Mumbai : सपा, राष्ट्रवादी गटाला समितीतही स्थान नाही; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच समिती; एमआयएमला लॉटरी

...तर पालिका आयुक्त, अधिकाऱ्यांचे पगार रोखू; हायकोर्टाची तंबी: प्रदूषण रोखण्यात BMC प्रशासन अपयशी!

भारत-न्यूझीलंड टी-२० मालिका : इशान, सूर्याचा झंझावात; न्यूझीलंडवर सहज मात; दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा ७ गडी राखून शानदार विजय