महाराष्ट्र

सध्याचे सरकार फारच रडके! मनोज जरांगेंचा हल्लाबोल

सध्याचे सरकार फारच रडके आहे. एवढे रडके सरकार मी केव्हाच पाहिले नव्हते. देवेंद्र फडणवीस फारच हुशार व राजकारणातील चाणक्य आहेत असे वाटायचे, पण ते फक्त फोडाफोडीतच हुशार असल्याचे दिसून येते, अशी टीका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी केली.

Swapnil S

जालना : सध्याचे सरकार फारच रडके आहे. एवढे रडके सरकार मी केव्हाच पाहिले नव्हते. देवेंद्र फडणवीस फारच हुशार व राजकारणातील चाणक्य आहेत असे वाटायचे, पण ते फक्त फोडाफोडीतच हुशार असल्याचे दिसून येते, अशी टीका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी केली.

अंतरवाली सराटीत जरांगे-पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी आरक्षण रद्द करण्यासंबंधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका कथित विधानासह मराठा आरक्षणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली.

‘आम्ही गोरगरीब लोकांसाठी संघर्ष करत आहोत, तर काही ठिकाणी फडणवीस यांच्या निर्देशांनुसार सरकारी आंदोलने सुरू आहेत. मात्र समाज हुशार आहे, तो सर्वकाही पाहत आहे. फडणवीस यांच्या जीवावर मस्ती करणाऱ्यांचे दिवस भरलेत. समाज त्यांचा हिशोब करील. राजकीय पक्षाला बाप मानणारे असे किती आले आणि गेले, भाजपही संपेल. भाजप आमदार प्रसाद लाड थोड्याच दिवसात वेडे होणार, असा टोलाही त्यांनी लगावला.

महायुती सरकारने सगेसोयऱ्याची अधिसूचना काढली, पण तिची अंमलबजावणी केली नाही. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची ग्वाही देऊनही ते मागे घेतले नाहीत, बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना नोकऱ्या दिल्या नाहीत, शिंदे समितीला मुदतवाढ दिली असतानाही ही समिती काम करत नाही, मराठ्यांचे ‘ईडब्लूएस’ रद्द का केले? अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी महायुती सरकारवर यावेळी केली.

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे