महाराष्ट्र

१३ जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघ अखेर जेरबंद

या वाघाने वडसा येथे सहा जणांचा, तर भंडारामध्ये चार आणि ब्रह्मपुरी अभयारण्यात तीन जणांचा जीव घेतला आहे

वृत्तसंस्था

एक-दोन नव्हे, तर तब्बल १३ जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू होते.

या वाघाने वडसा येथे सहा जणांचा, तर भंडारामध्ये चार आणि ब्रह्मपुरी अभयारण्यात तीन जणांचा जीव घेतला आहे. ‘सीटी-१’ या नरभक्षक वाघाने भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातला होता. त्यामु‌ळेच नागपूरच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. ताडोबा अभयारण्यातील विशेष पथक या वाघाला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते; परंतु तीन महिन्यांपासून हा वाघ हुलकावणी देत होता. वडसा अभयारण्यात या वाघाची हालचाल दिसून आल्याने तसेच मानवी जीवाला धोका असल्याने या वाघाला पकडण्यासाठी खिंड लढवली जात होती. अखेर गुरुवारी सकाळी या वाघाला पकडण्यात यश आले आहे. ‘सीटी-१’ या वाघाने आतापर्यंत १३ लोकांची शिकार केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक दहशतीखाली वावरत होते. दोन दिवसांपूर्वी देसाईगंजजवळच्या एका गाईवर या वाघाने हल्ला केला. त्यामुळे तेथेच वनविभागाची टीम पाळत ठेवून होती. गुरुवारी सकाळी ताडोबा येथील टीमने या वाघाला जेरबंद केले. त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडल

मुंबईत उद्या पाणीपुरवठा खंडित; काही भागात कमी दाबाने पाणी

सुभाषचंद्र बोस यांना ‘राष्ट्रपुत्र’ घोषित करा; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Tanvi Kolte : मराठी जिंकलं, आता 'बिग बॉस हिंदी'मध्ये एंट्री? विजेत्या तन्वी कोलतेने दिलं उत्तर; म्हणाली - "ऑफर मिळाली..."

IPL 2026 : गोलंदाजांची आज अग्निपरीक्षा; सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांमध्ये जुगलबंदी

रुग्णांसाठी एकीकृत कार्यपद्धती लागू करावी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश