''खोटे राजकारण ते सहन करणार नाहीत,'' दिल्ली निवडणूक निकालांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया  संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

''खोटे राजकारण ते सहन करणार नाहीत,'' दिल्ली निवडणूक निकालांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या विजयावर आनंद व्यक्त केला आणि म्हटले की, राष्ट्रीय राजधानीतील लोकांनी दाखवले की ते ‘खोट्या राजकारणाला’ आता सहन करणार नाहीत. त्यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ‘भ्रष्टाचाराचे प्रतीक’ असे वर्णन केले.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या विजयावर आनंद व्यक्त केला आणि म्हटले की, राष्ट्रीय राजधानीतील लोकांनी दाखवले की ते ‘खोट्या राजकारणाला’ आता सहन करणार नाहीत. त्यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ‘भ्रष्टाचाराचे प्रतीक’ असे वर्णन केले.

भारतीय जनता पार्टी दिल्लीमध्ये सरकार स्थापनेसाठी सज्ज असून, निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार भाजपने ७० पैकी ४१ विधानसभा जागांवर विजय मिळविला आहे आणि सात ठिकाणी आघाडीवर आहे, तर आम आदमी पार्टीने आतापर्यंत २१ जागांवर विजय मिळवला आहे आणि एका जागेवर आघाडी घेतली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना, फडणवीस म्हणाले, २७ वर्षांच्या अंतरानंतर भाजपला दिल्लीमध्ये पुन्हा निवडून आले आहे, यावर मला आनंद झाला आहे. दिल्लीच्या लोकांनी सिद्ध केले की ते खोट्या राजकारणाला सहन करणार नाहीत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवून भाजपला मतदान केले.

त्यांनी ‘एक आहेत तर सुरक्षित आहेत’ हा घोषवाक्य देशभर पुढे काम करेल असा विश्वास व्यक्त केला. हे आधीच महाराष्ट्र, हरयाणामध्ये आणि आता दिल्लीमध्ये दिसले आहे आणि हे पुढेही काम करत राहील,असे मुख्यमंत्री म्हणाले.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन