मुंबई : राज्यात भाजप-शिवसेना महायुतीकडून सुरू असलेल्या 'बिनविरोध' निवडून येण्याचा पॅटर्न लोकशाहीसाठी घातक असून विरोधकांनी एकत्र येत आवाज उठवायला सुरू केली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह राज्यात बिनविरोध निवडून आलेल्या ७० उमेदवारांची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामध्ये, सर्वाधिक उमेदवार हे भाजपचेच उमेदवारांना आहेत. दबाव तंत्र, पैशांचे आमिष दाखवून निवडणुकीतून माघार घ्यायला लावल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे ठाण्यात मनसेच्या एका उमेदवारानेही निवडणुकीतून माघार घेतल्याने मनसैनिकांना हा मोठा धक्का होता, त्यामुळे बिनविरोध झालेले हे उमेदवार कसे निवडून आले आहेत? याची पोलखोल येणाऱ्या सभांच्या माध्यमातून राज ठाकरे करणार आहेत.
मनसे बिनविरोधप्रकरणी उद्या जाणार कोर्टात राज ठाकरे आगामी प्रचार सभांमधून कॉल रेकॉर्ड आणि व्हिडीओच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे पुरावे जनतेसमोर आणणार आहेत. कारण, राज ठाकरे यांच्याकडे ठाणे आणि कल्याण डोंबिवलतील नेत्यांनी हे पुरावे सुपूर्द केले असल्याची माहिती आहे. तसेच, महानगरपालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या प्रकरणी राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसे आक्रमक झाली आहे. या सगळ्याप्रकरणी येत्या सोमवारी मनसे बिनविरोध उमेदवार आणि त्यांच्या जागांबाबत कोर्टात जाणार आहे. तसेच सोमवारी या सगळ्या प्रकरणी मनसेचे प्रमुख नेते राज्य निवडणूक आयुक्तांची भेटही घेणार आहेत.