महाराष्ट्र

पुढील ४ दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले

प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून राज्यावर अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे. यामुळे काही जिल्ह्यात शेतकऱ्यांची उभी पिके जमीनदोस्त झाली. आता मंगळवारी आणि बुधवारी काही शहरांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर येत्या ४ दिवसात राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तसेच, काही भागामध्ये गारपिटदेखील होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे हवामान खात्याने शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये हिंगोली, जालना तसेच पुणे जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईतही अनके भागांत पावसाची रिमझिम पहायला मिळाली. तसेच ठाणे जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. यामुळे रब्बीची पिके धोक्यात आली असून गहू, हरभरासह आंबा, द्राक्ष आणि केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले.

शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी! आता दरवर्षी ५० तासांचे प्रशिक्षण अनिवार्य; शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

मोरा-मुंबई रो-रो सेवेचा एप्रिलचा मुहूर्त पुन्हा हुकला; ७५ कोटी रुपयांचा प्रकल्प रखडलेल्या स्थितीत

खड्डा चुकवताना रिक्षा थेट नदीत कोसळली; पेण-खोपोली मार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक जखमी

देवस्थानांकडचे मोठे भूखंड होणार खुले; इनामी जमीन रद्द करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव

मोठी बातमी! सुधारित पेन्शन योजना आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक; शासनाकडून नवीन परिपत्रक जारी