महाराष्ट्र

पुढील ४ दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले

प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून राज्यावर अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे. यामुळे काही जिल्ह्यात शेतकऱ्यांची उभी पिके जमीनदोस्त झाली. आता मंगळवारी आणि बुधवारी काही शहरांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर येत्या ४ दिवसात राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तसेच, काही भागामध्ये गारपिटदेखील होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे हवामान खात्याने शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये हिंगोली, जालना तसेच पुणे जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईतही अनके भागांत पावसाची रिमझिम पहायला मिळाली. तसेच ठाणे जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. यामुळे रब्बीची पिके धोक्यात आली असून गहू, हरभरासह आंबा, द्राक्ष आणि केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले.

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

अहिल्यानगरमध्ये तणाव; रास्ता रोको, लाठीमार

भारत-भूतान रेल्वेमार्गाने जोडणार; प्रकल्पाचा संयुक्त आराखडा जाहीर

पीडितांकडे न्यायालयाचे दुर्लक्ष नको; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू; केरळ भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान