महाराष्ट्र

पुढील ४ दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले

प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून राज्यावर अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे. यामुळे काही जिल्ह्यात शेतकऱ्यांची उभी पिके जमीनदोस्त झाली. आता मंगळवारी आणि बुधवारी काही शहरांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर येत्या ४ दिवसात राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तसेच, काही भागामध्ये गारपिटदेखील होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे हवामान खात्याने शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये हिंगोली, जालना तसेच पुणे जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईतही अनके भागांत पावसाची रिमझिम पहायला मिळाली. तसेच ठाणे जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. यामुळे रब्बीची पिके धोक्यात आली असून गहू, हरभरासह आंबा, द्राक्ष आणि केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत