महाराष्ट्र

‘गणेशोत्सवात खासगी वाहनांना टोल माफ करा’

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी खासगी वाहनांना टोल माफी द्या, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Swapnil S

मुंबई : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी खासगी वाहनांना टोल माफी द्या, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या भागातून लाखो गणेशभक्त कोकणातील गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी जातात. यावर्षी ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यामुळे ४ सप्टेंबरपासून कोकणातील गणेशभक्त हे आपल्या मूळ गावी गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने निघणार आहेत. शासनाने ४ सप्टेंबरपासून ते संपूर्ण गणेशोत्सवापर्यंत कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना टोल माफी करण्याची त्वरित कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात यावे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आनंदवार्ता! केरळमध्ये मान्सून दाखल; मुंबईत कधी बरसणार?

Mumbai : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाला वेग; जुळ्या बोगद्यांसाठी TBM यंत्रणा उभारणी अंतिम टप्प्यात

'सॉरी आई बाबा... मी सगळं उद्ध्वस्त केलं’; NEET परीक्षार्थी विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाइड नोटमुळे हळहळ

Mumbai : एअर इंडियाची इमारत १५ ऑगस्टपासून सेवेत रुजू

पुणे विषारी दारू प्रकरणात नवी मुंबईतील बाप-लेक अटकेत; घातक रसायने पुरविल्याचे उघड, आतापर्यंत ३३३ जणांवर कारवाई