महाराष्ट्र

‘गणेशोत्सवात खासगी वाहनांना टोल माफ करा’

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी खासगी वाहनांना टोल माफी द्या, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Swapnil S

मुंबई : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी खासगी वाहनांना टोल माफी द्या, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या भागातून लाखो गणेशभक्त कोकणातील गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी जातात. यावर्षी ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यामुळे ४ सप्टेंबरपासून कोकणातील गणेशभक्त हे आपल्या मूळ गावी गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने निघणार आहेत. शासनाने ४ सप्टेंबरपासून ते संपूर्ण गणेशोत्सवापर्यंत कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना टोल माफी करण्याची त्वरित कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात यावे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

“शशी थरूर यांना स्पर्धक मिळाला”; पंजाबच्या महापुराबाबत पठ्ठ्याचं तोडकं-मोडकं इंग्रजी ऐकून नेटकरी लोटपोट, Video व्हायरल