मुंबई

२० ते २५ दहशतवादी असून बॉम्ब तयार करत असल्याला फेक कॉल ; मुंबई पोलिसांत खळबळ

मुंबई पोलिसांना गेल्या काही महिन्यांपासून ८० हून खोटी माहिती देणारे किंवा धमकी देणारे फोन आले आहेत.

नवशक्ती Web Desk

मुंबई पोलिसांना गेल्या काही महिन्यांपासून ८० हून खोटी माहिती देणारे किंवा धमकी देणारे फोन आले आहेत. गेल्या आठवड्यात मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा खोटा फोनकॉल ११२ क्रमांकाच्या हेल्पलाईनला आला होता. मुख्यमंत्र्यांशी बोलायला नाही दिले तर मंत्रालय उडवून देईन अशी धमकी फोन करणाऱ्याने दिली होती. तसंच दक्षिण मुंबईतील एका महिलेने ३८ वेळा कॉल करून पोलिसांना त्रास दिला होता आणि आता बोरिवली येथील कस्तुरबा मार्ग परिसरात २० ते २५ जण बॉम्ब तयार करत असल्याचा कॉल मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी ताबडतोब तपास सुरु केला आहे.

बोरिवली कस्तुरबा मार्ग येथील लेबर कॅम्प परिसरात २० ते २५ जण बॉम्ब तयार करत आहेत आणि ते लोकं दहशतवादी असल्याची माहिती देणारा फोनकॉल मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला सोमवारी सकाळी चारच्या सुमारास आला. ही माहिती गुन्हे शाखेने पोलिसांना दिल्यानंतर बांगुर नगर पोलिसांनी घटनास्थळी लगेच जाऊन एका संशयीताला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यांनतर आरोपीने दारूच्या नशेत खोटा फोनकॉल केला हे कबूल केलं.

पोलिसांनी एका संशयी इसमाला ताब्यात घेतलं आहे आणि त्याने दारूच्या नशेत खोटी माहिती दिली हे समोर आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस बंदोबस्तासाठी सगळीकडे तैनात असताना या कॉलमुळे पोलीस यंत्रणांवरील ताण अधिक वाढला आहे.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता