मुंबई

2006 Mumbai Local Train Blasts : नऊ जणांची तुरुंगातून सुटका, दोघे कारागृहात

७/११ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवलेल्यांपैकी नऊ जणांची महाराष्ट्रातील विविध तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे, तर दोन जण अजूनही इतर प्रलंबित प्रकरणांमुळे तुरुंगात आहेत.

Swapnil S

मुंबई : ७/११ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवलेल्यांपैकी नऊ जणांची महाराष्ट्रातील विविध तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे, तर दोन जण अजूनही इतर प्रलंबित प्रकरणांमुळे तुरुंगात आहेत. नाशिक रोड तुरुंगात शिक्षा भोगत असलेला सजिद अन्सारी हा उच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होतानाच पॅरोलवर बाहेर होता. मंगळवारी सकाळी अन्सारी तुरुंग अधिकाऱ्यांपुढे हजर झाला आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याची अधिकृत सुटका करण्यात आली. येरवडा मध्यवर्ती तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या दोनपैकी एक, आरिफ खान बशीर खान याची सुटका करण्यात आली. मात्र, मोहम्मद फैसल रहमान शेख याच्यावर आणखी एक खटला प्रलंबित असल्यामुळे तो अद्याप तुरुंगात आहे.

नागपूर मध्यवर्ती तुरुंगातून एथेशाम सिद्दिकी आणि मोहम्मद अली आलम शेख यांची सुटका करण्यात आली. मात्र, त्यांच्यासोबत असलेला नावेद खान अजूनही एका हत्या प्रयत्न प्रकरणात आरोपी असल्यामुळे तुरुंगातच आहे. डॉ. तन्वीर अन्सारी, सुहैल महमूद शेख, जमीर अहमद लातीपूर रहमान शेख, आणि मोहम्मद साजिद मोहम्मद शफी यांची अमरावती तुरुंगातून सुटका करण्यात आली, तर मुझम्मिल अत्ताउर रहमान शेख याची नाशिक रोड मध्यवर्ती तुरुंगातून सुटका झाली.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत रंगत वाढली; शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांची माघार; काँग्रेसचे आकाश मोरे मैदानात ठाम

Mumbai : ३१ मे पर्यंत १०० टक्के नालेसफाई पूर्ण करा! पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

भोंदू अशोक खरात प्रकरण : अश्लील व्हिडिओ व्हायरल करणे महागात, गुन्हा दाखल

कोकणातील कातळशिल्पांवर बनणार आंतरराष्ट्रीय माहितीपट; सरकारकडून १४.५० कोटींच्या निधीला मान्यता

व्याज दर तूर्त स्थिर; RBI चे 'वेट अँड वॉच' धोरण; GDP ६.९ टक्के, महागाई दर ४.६ टक्के राहण्याचा अंदाज