मुंबई

कंटेनरच्या धडकेत २५ वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू

अपघातानंतर कंटेनरचालक पळून गेल्याने त्याच्याविरुद्ध आरे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

प्रतिनिधी

मुंबई : भरवेगात जाणाऱ्या एका कंटेनरच्या धडकेने नीरज कैलास गुप्ता या २५ वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनरचालक पळून गेल्याने त्याच्याविरुद्ध आरे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. हा अपघात शनिवारी मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास गोरेगाव येथील पवईकडून जाणाऱ्या जेव्हीएलआर रोड, पामेरीनगर जवळील जोगेश्‍वरीच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर झाला. नीरज एअरटेल कंपनीत टेक्निशियन म्हणून कामाला असून कंपनीच्या डेटा सेंटरमधील नेटवर्कबाबत काही अडचणी असल्यास ते दूर करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. शनिवारी तो कामानिमित्त अंधेरी येथे बाईकवरून जात असताना रात्री उशिरा दोन वाजता भरवेगात जाणाऱ्या एका कंटेनरने त्याच्या बाईकला धडक दिली. नीरज ट्रकच्या चार चाकांमध्ये अडकल्यामुळे त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी खासगी क्रेनसह फायरबिग्रेडची मदत घेतली होती. मात्र बाहेर काढल्यानंतर ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले असता, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर होण्याची शक्यता; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पाऊस वाढण्याची धास्ती; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

जामीन अर्जांच्या सुनावणीत चालढकल खपवून घेणार नाही; कोर्टाला सहकार्य करण्याचे निर्देश; उच्च न्यायालयाची कठोर भूमिका

मराठा समाजबांधवांना तात्पुरता दिलासा; हैदराबाद गॅझेटविरोधात सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार