मुंबई

कंटेनरच्या धडकेत २५ वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू

अपघातानंतर कंटेनरचालक पळून गेल्याने त्याच्याविरुद्ध आरे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

प्रतिनिधी

मुंबई : भरवेगात जाणाऱ्या एका कंटेनरच्या धडकेने नीरज कैलास गुप्ता या २५ वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनरचालक पळून गेल्याने त्याच्याविरुद्ध आरे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. हा अपघात शनिवारी मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास गोरेगाव येथील पवईकडून जाणाऱ्या जेव्हीएलआर रोड, पामेरीनगर जवळील जोगेश्‍वरीच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर झाला. नीरज एअरटेल कंपनीत टेक्निशियन म्हणून कामाला असून कंपनीच्या डेटा सेंटरमधील नेटवर्कबाबत काही अडचणी असल्यास ते दूर करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. शनिवारी तो कामानिमित्त अंधेरी येथे बाईकवरून जात असताना रात्री उशिरा दोन वाजता भरवेगात जाणाऱ्या एका कंटेनरने त्याच्या बाईकला धडक दिली. नीरज ट्रकच्या चार चाकांमध्ये अडकल्यामुळे त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी खासगी क्रेनसह फायरबिग्रेडची मदत घेतली होती. मात्र बाहेर काढल्यानंतर ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले असता, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; म्हणाल्या - 'राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या...

Ram Sutar Passes Away : भारतीय शिल्पकलेतील युगाचा अंत; ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार यांचे निधन

मीरा भाईंंदरच्या अंतिम मतदार यादीतही प्रचंड घोळ; अनेक मतदारांची नावे ठाणे महापालिकेत तर १६०० मतदारांची नावे घरापासून लांब

भारत आणि ओमान आज मस्कतमध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करणार

ठाण्यात भाजप-शिवसेनेचं ठरलं! शिंदे सेना भाजपला जागा वाटपाचा नवा प्रस्ताव देणार