मुंबई

विदेशी गुंतवणूक संस्थांची ४९,२५० कोटींची गुंतवणूक

वृत्तसंस्था

गेल्या महिन्यात पुन्हा गुंतवणुकीला सुरुवात केल्यानंतर ऑगस्टमध्ये आतापर्यंत विदेशी गुंतवणूक संस्थांनी (एफपीआय) ऑगस्टमध्ये आतापर्यंत शेअर बाजारात ४९,२५० कोटींची खरेदी केली आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणूक संस्थांनी त्यांचा २० महिन्यांचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये ६२,०१६ कोटींची गुंतवणूक करण्यात आली होती. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून सातत्याने पैसे काढणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांनी या वर्षी जुलैमध्ये ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून पुनरागमन केले. विश्लेषकांचे म्हणणे आहे की ऑक्टोबरपासून बाजारातील घसरणीचे प्रमुख कारण एफपीआयने गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला होता. जुलैपासून ते परतल्याने बाजारातही पुनरागमन होऊन सेन्सेक्स पुन्हा ६० हजारांच्या जवळ आला आहे. ऑक्टोबर २०२१ ते जून २०२२ या कालावधीत विदेशी संस्थांनी २.४६ लाख कोटींच्या समभागांची विक्री भारतीय शेअर बाजारातून केली होती.

सात कंपन्यांच्या बाजारमूल्यात १.५४ लाख कोटींची घट

आघाडीच्या दहापैकी सात कंपन्यांच्या बाजारमूल्यात गेल्या आठवड्यात १,५४,४७७.३८ कोटींची घट झाली आहे. टीसीएस आणि इन्फोसिस यांच्या समभागात मोठी घट झाली आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स ८१२.२८ अंक किंवा १.३६ टक्के घसरण झाली. दहापैकी रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या तीन कंपन्यांच्या बाजारमूल्यात वाढ झाली.

मुंबईत २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा; 'असा' बचाव करा

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६१ टक्के मतदान; उत्तर प्रदेशात सर्वात कमी प्रतिसाद, तर 'या' राज्यात सर्वाधिक टक्केवारी

जरांगे-पाटील उतरणार विधानसभेच्या मैदानात, राज्यात २८८ जागांवर उमेदवार देणार; प्रस्थापितांना धक्के बसणार?

आता शेतकऱ्यांना मिळणार केवळ ५ मिनिटांत कर्ज; नाबार्ड-आरबीआय इनोव्हेशन हब यांच्यात करार

दुसऱ्या टप्प्यातही यादीत घोळ; अनेकजण मतदानाविना परतले, प्रशासनाची अनास्था कायम