मुंबई

घरे देण्याच्या नावाखाली ९,३८० कोटींचा घोटाळा

माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा आरोप

प्रतिनिधी

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवण्यात येत असून प्रकल्प बाधितांना घरे देण्याच्या नावाखाली ९,३८० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. पालिका मुख्यालयातील काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, मुलुंड, भांडुप, वरळी आदी ठिकाणी १४ हजार घरे बांधली जाणार होती. या प्रकल्पाची रेडी रेकनर नुसार मुळ किंमत ३२०० कोटी होती. परंतु पालिकेने विकासकांना प्रिमियम क्रेडिट नोट, भुखंड टीडीआर, कंन्स्ट्रकशन टिडीआर मधून बिल्डरला ९३८० हजार कोटींचा फायदा करून देण्यात आला आहे, असा आरोपही राजा यांनी केला आहे.

मुलुंड, भांडुप, वरळी आदी ठिकाणी १४ हजार घरे बांधली जाणार होती. या प्रकल्पाची रेडी रेकनर नुसार मुळ किंमत ३२०० कोटी होती. परंतु पालिकेने विकासकांना प्रिमियम क्रेडिट नोट, भुखंड टीडीआर, कंन्स्ट्रकशन टिडीआर मधून बिल्डरला ९३८० हजार कोटींचा फायदा करून देण्यात आला. हा पालिकेतील सर्वात मोठा भूखंड टीडीआर घोटाळा आहे. मुंबईकरांच्या पैशांची ही उधळपट्टी केली जात असल्याने या प्रकरणी लोकायुक्त, पालिका आयुक्त व सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनला पत्र दिले आहे. या प्रकरणी गरज पडल्यास न्यायालयात जाणार असल्याचे रवी राजा म्हणाले.

हॉटेल उद्योगावर मंदीचे सावट; शुल्क कमी न केल्यास ‘हॉटेल बंदचा’ व्यावसायिकांचा इशारा

IND vs ENG 2025 : क्रिकेटच्या पंढरीत भारताची कसोटी! लॉर्ड्स स्टेडियमवर आजपासून तिसरा सामना, मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य

मुंबई-गोवा महामार्गावरील नवीन सिमेंटचे रस्तेही खचले; शिवसेना ठाकरे गटाच्या पाहणी दौऱ्यात प्रशासनाची पोलखोल

सरकारी धोरणांविरोधात आंदोलनांची लाट; ठाणे-भिवंडी-पालघरमध्ये संघटनांचा एल्गार

भारतीय वंशाचे सबिह खान Apple चे नवे COO; लवकरच घेणार जेफ विल्यम्स यांची जागा