मुंबई

'अदानी'च्या स्वाभिमान उपक्रमामुळे महिलांना रोजगार

Swapnil S

मुंबई : अदानी इलेक्ट्रिसिटी आणि अदानी फाऊंडेशन यांच्या स्वाभिमान सीएसआर उपक्रमामुळे मुंबईतील साडेतीन हजार वंचित महिलांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. या उपक्रमाद्वारे महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून त्यांना रोजगाराची आणि उपजीविकेची साधने आणि संधी दिल्या जातात.

भारताची अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी महिला सक्षमीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांना एकमेकांच्या साथीने सर्वांचा विकास करता यावा यासाठी स्वयंसहाय्यता गट हे महत्त्वाचे साधन असून ती संधी महिलांनी साधावी, असे अदानी फाऊंडेशनचे प्रवक्ते सुबोध सिंह यासंदर्भात म्हणाले. स्वाभिमान उपक्रमाद्वारे महिलांना व्यवसाय प्रशिक्षण, व्यवसाय संधी तसेच त्यांना स्वयंपूर्ण उद्योजक बनवण्यासाठी साधने दिली जातात. वंचित महिलांना उपजीविकेची साधने देण्यातही स्वयंसहाय्यता ग्रुप महत्त्वाची भूमिका बजावतात. याद्वारे महिलांना उद्योगांच्या अनेक संधी मिळतात, असे अदानी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितले.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल