मुंबई

Mumbai : एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरले; तीन टायर फुटले

एअर इंडियाचे ‘एआय-२७४४’ हे विमान सोमवारी सकाळी मुंबई विमानतळावर उतरताना पावसामुळे धावपट्टीवरून घसरले. या दुर्घटनेत विमानाचे ३ टायर फुटले.

Swapnil S

मुंबई : एअर इंडियाचे ‘एआय-२७४४’ हे विमान सोमवारी सकाळी मुंबई विमानतळावर उतरताना पावसामुळे धावपट्टीवरून घसरले. या दुर्घटनेत विमानाचे ३ टायर फुटले. हे विमान कोच्चीहून मुंबईला येत होते. या अनपेक्षित घटनेमुळे विमान काही क्षण अनियंत्रित झाले. पण वैमानिकाने प्रसंगावधान राखून त्यावर नियंत्रण मिळवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला व विमान सुरक्षितपणे लँड झाले. सर्व प्रवासी व क्रू सदस्य सुखरूप आहेत.

विमानाचे ३ टायर फुटले

ही दुर्घटना सोमवारी सकाळी ९ वाजून २७ मिनिटांनी घडली. या घटनेत विमानाचे ३ टायर फुटले. यात मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी ०९/२७चे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे ती उड्डाणासाठी बंद करण्यात आली आहे. दुसरी धावपट्टी १४/३२ ही विमान वाहतूक सुरू ठेवण्यासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी ‘नागरी विमान वाहतूक महासंचालनालया’चे (डीजीसीए) एक पथक करीत आहे.

एअर इंडियाने सांगितले की, विमानाला सुरक्षितपणे हँगरपर्यंत पोहोचवण्यात आले. सर्वच यात्री व क्रू सदस्यांना उतरवण्यात आले. विमानाला आता पुढील तपासणीसाठी ग्राऊंड करण्यात आले आहे. याप्रकरणी आवश्यक ती सुरक्षा तपासणी केली जात आहे.

2006 Mumbai Local Train Blasts : हायकोर्टाच्या निर्णयाला महाराष्ट्र शासनाचे सुप्रीम कोर्टात आव्हान; २४ जुलैला सुनावणी

‘...तर तुमची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू’; अमेरिकन सिनेटरचा भारताला इशारा, चीन आणि ब्राझिललाही धमकी

Kalyan : ''तुम्ही जरा थांबा'' बोलल्याने परप्रांतिय तरुणाकडून मराठी मुलीला बेदम मारहाण; शिवगाळ करत विनयभंग| Video

जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत कोण? 'ही' नावे चर्चेत, महाराष्ट्रातील नेत्याचं नावही आघाडीवर

दिव्या देशमुख, कोनेरू हम्पीची ऐतिहासिक भरारी! महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताकडून पहिल्यांदाच 'अशी' कामगिरी