मुंबई

Ajit Pawar : 'उगाच सारखं सारखं...' पहाटेच्या शपथविधीवर काय म्हणाले अजित पवार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केल्यानंतर पत्रकारांनी अजित पवारांना (Ajit Pawar) विचारले प्रश्न

प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पहाटेच्या शपथविधीवर अनेक गौप्यस्फोट केले होते. त्यानंतर यावर अजित पवारांना (Ajit Pawar) प्रतिक्रिया विचारली असताना त्यांनी प्रसार माध्यमांना स्पष्ट सांगितले की, "उगाच सारखं सारखं तेच प्रश्न विचारू नका. माझी भूमिका मी स्पष्ट केली आहे." असे म्हणत त्यांनी स्पष्ट सांगितले. पुढे ते म्हणाले की, "त्या घटनेविषयी मी बोलणार नाही. बाकीचे काय बोलतात, त्यावर मला काही बोलायचे नाही. मी त्याबद्दल बोलणार नसून विषय संपला" असे बोलून पुढे काही बोलण्यास त्यांनी नकार दिला.

महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येण्याअगोदर ३ वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पहाटे राजभवनवर शपथ घेतली होती. मात्र, दीड दिवसांतच हे सरकार कोसळले होते. याविषयीचे गूढ अद्याप कायम आहे. त्यातच शरद पवार यांच्या संमतीनेच भाजप-राष्ट्रवादीचे सरकार अस्तित्वात आले होते, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे राजकारण तापले आहे. मात्र, त्याचवेळी फडणवीस यांनी अधिक तपशील सांगण्यास नकार दिला. "अजित पवार यावर बोलल्यास मी पुढचं सांगेन," असंही फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे पत्रकारांनी गुरुवारी अजित पवार यांना याबद्दल विचारले. मात्र, त्यांनी काही बोलण्यास नकार दिला. ‘‘त्या घटनेविषयी मी बोलणार नाही. बाकीचे काय बोलतात, त्यावर मला काही बोलायचे नाही. मी त्याबद्दल बोलणार नाही. विषय संपला. दुसरे काही विषय असतील तर मला विचारा. अजित पवार मागेच बोललेला आहे. तो त्याच्या मतावर ठाम राहणार. तुम्ही कितीही उगळून काढले तरी माझ्याकडून हेच उत्तर मिळणार,’’ असे अजित पवारांनी पत्रकारांना सुनावले.

Maharashtra Rain : महाराष्ट्राला पावसाचा तडाखा; ८३ लाख एकरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान

मराठवाडा पूरग्रस्तांसाठी लालबागचा राजा मंडळाची मदत; पारलिंगी समुदायाने मागितला जोगवा, राज्यातील शिक्षकांचाही पुढाकार

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्ततेनंतर लष्करात पुन्हा स्थान; प्रसाद पुरोहित यांची कर्नल पदी बढती

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून