Administrator
मुंबई

जहांगीर आर्ट गॅलरीत मानवी मुखवट्यांची वैशिष्ट्ये दर्शविणारे चित्रप्रदर्शन

हे प्रदर्शन २२ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांना विनामूल्य पाहता येणार

देवांग भागवत

चित्रकार योगेश शिरवडकर ह्यांच्या नवनिर्मित चित्रांचे १५ वे एकल कलाप्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे २२ नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. हे प्रदर्शन २२ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहे. या प्रदर्शनात चित्रकाराने मानवी आयुष्यात त्याला विविध प्रसंगी धारण कराव्या लागणाऱ्या मुखवट्यांची वैशिष्ट्ये प्रसंगानुरूप त्यात आढळणारे वैविध्य यासंबंधी आपल्या चित्रमाध्यमातून प्रकाश टाकला आहे.               

प्रस्तुत प्रदर्शनात त्यांनी आपल्या खास वैशिष्ट्यपूर्ण तंत्र व शैलीचा कलात्मक वापर करून तयार केलेली चित्रे ठेवली आहेत. त्यात मानवी जीवनात असणारे विविधलक्षी मुखवट्यांचे महत्व व त्यांची उपयुक्तता यावर आपल्या चित्रमाध्यमातून वैचारिक संकल्पना मांडली आहे. त्यात प्रामुख्याने आनंद, चिंता, भीती, स्वीकार, प्रेम, आवड, दुःख विरह, राग, अगतिकता, पुरुषी अहंभाव तसेच स्त्रीदाक्षिण्य, निजरूप लपविण्याचा व त्याची अन्य रूप प्रकटीकरणाची मानसिकता ह्या विविध मनोविकारांचे रसिकांना दर्शन होते. त्याचप्रमाणे अंतर्मनात असणारे मूळ भाव व मानसिकता ह्यावर विवेचन करतांना त्याने त्यांचे कलात्मक व प्रकात्मक स्वरूपात दर्शन सर्वांना घडवले असून त्यात मुख्यतः मानवी मनातील विकार, अन्य सजीव प्राण्यांचे भावविश्व् आणि त्यांचे असणारे परस्पर भावनिक नाते व विविध टप्प्यावर होणारे त्यांचे प्रकटीकरण व प्रसंगानुसार उत्कट सादरीकरण ह्यांचे फार कलात्मक व बोलके दर्शन सर्वांना घडवले आहे. योग्य रंगांच्या लेपनातून व त्यांच्या कलात्मक थरांमधून त्याने येथे सादर केलेली मुखवट्यांची अनेक भावपूर्ण रूपे खरोखर विलक्षण व मनोवेधक आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक