मुंबई

ॲण्टाॅप हिल येथे जलवाहिनीला गळती: हजारो लिटर पाणी वाया ; पाणी जपून वापरा, पालिकेचे नागरिकांना आवाहन

मुंबईत गेल्या काही दिवसांत जलवाहिनी, पाइपलाईन फुटण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत

Swapnil S

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांत जलवाहिनी, पाइपलाईन फुटण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मंगळवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ - उत्तर विभागातल्या ॲण्टाॅप हिल परिसरातील रावजी गणात्रा मार्ग सी. जी. एस. कॉलनी येथील ६०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागल्याची घटना घडली. गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. पालिकेच्या जल विभागाने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. काम होईपर्यंत काही विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून, काही भागात बुधवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

'या' भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम!

‘एफ उत्तर’ विभागातील कोकरी आगर, विजय नगर, संगम नगर, दोस्ती एकर्स, हिम्मत नगर, शांती नगर, आझाद मोहल्ला, ॲण्टाॅप हिल, वडाळा पूर्व, गणेश नगर, शिवशंकर नगर, नेहरू नगर , इंदिरा नगर, वडाळा ट्रान्झिट कॅम्प, पंजाबी कॉलनी, सेवा समिती, म्हाडा कॉलनी, सायन कोळीवाडा, बी. पी. टी., बंगालीपुरा, राजीव गांधी नगर ई. ठिकाणी बुधवारी पाणीपुरवठा होणार नाही.

घरात चिखल, शेतात पाणीच पाणी! दुष्काळासाठी ओळखणारा मराठवाडा अतिवृष्टीने हैराण; बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : आरोग्य उपचारांसाठी मोठा दिलासा, तर रेल्वे आणि गृहनिर्माण क्षेत्राला चालना

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव