मुंबई

Bhagatsingh Koshyari : राज्याचे राज्यपाल राजीनामा देणार? पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केली इच्छा

गेले अनेक दिवस वादामध्ये अडकलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी पंतप्रधान मोदींकडे राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली

प्रतिनिधी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (Narendra Modi) राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पदमुक्त होऊन उर्वरित आयुष्य चिंतन, मनन करण्यात घालवण्याचा मानस असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांच्या मुंबई दौऱ्यात व्यक्त केली असल्याची माहिती राजभावातून प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकारातून समोर आली आहे.

जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये भगतसिंग कोश्यारी म्हणाले आहेत की, "महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील." ट्विट करतदेखील त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Ram Navami 2026 : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मुंबईत २००० ड्रोनचा भव्य शो; काय असणार खास? जाणून घ्या वेळ आणि स्थळ

केंद्र सरकारचा निर्णय; घरात PNG असेल तर LPG पुरवठा बंद, गॅस कनेक्शनवर नवे नियम लागू

Mumbai : ८७० रुपयांच्या वादातून संतापजनक प्रकार; ओशिवरामध्ये सिगारेट विक्रेत्याला कारने फरफटत नेले, घटना CCTV मध्ये कैद

मुंबईकरांना दिलासा; मेट्रो 2Bमुळे चेंबूर परिसरातील प्रवास होणार जलद

Iran vs US-Israel War : युद्ध थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव; इराणसमोर ठेवल्या 'या' १५ अटी