मुंबई

शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपने आखली रणनीती,१३४ नगरसेवकांचे लक्ष्य

फेब्रुवारी २०२२मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत

प्रतिनिधी

एकनाथ शिंदे गटाच्या सहकार्याने राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपनेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता ‘लक्ष्य मुंबई महापालिका’ असा निर्धार सोमवारी भाजपच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी यंदाच्या निवडणुकीत १३४ नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार करत शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे.

फेब्रुवारी २०२२मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत; मात्र आता पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी नगरसेवक, कार्यकर्त्यांची आखणी केली गेली. आमदार मिहिर कोटेचा, भाजप प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा आदींनी मार्गदर्शन केले. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपचे स्वबळावर ८२ नगरसेवक निवडून आले होते. या ८२ जागांसह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या प्रभागांकडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला बैठकीत देण्यात आल्याचे समजते.

५० हजारांवरील व्याजावर TDS कपात; ज्येष्ठ नागरिकांसाठी १ लाखपर्यंत सवलत

Mumbai : 'मेट्रो वुमन' अश्विनी भिडे बनल्या पहिल्या महिला BMCआयुक्त; आज पदभार स्वीकारणार

"लोक एकमेकांवर पडत होते..." बिहारमध्ये शीतला मंदिरात भीषण चेंगराचेंगरी; ८ महिलांचा मृत्यू, अनेक जखमी; Video

'रेडी रेकनर' दरवाढ माफक राहणार?­ महागाई व जागतिक अनिश्चिततेचा परिणाम

Bigg Boss Marathi 6 : ‘घटस्फोटाचा मुद्दा काढत मर्यादा ओलांडल्या...राकेश-विशालच्या हाणामारीवर बापट कुटुंबीयांचा संताप; कारवाईची मागणी