मुंबई

मुंबईतून कोरोना झाला हद्दपार; दोन वर्षांनंतर गंभीर रुग्णांची शून्य नोंद

प्रतिनिधी

मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत चार लाटा धडकल्या होत्या. चौथी लाट मे महिन्यात धडकली होती; मात्र योग्य उपचार पद्धतीमुळे चौथी लाट रोखण्यात यश आले असून, तब्बल दोन वर्षांनंतर गंभीर रुग्णांची शून्य नोंद झाल्याने मुंबईतून कोरोना हद्दपार झाला आहे. दरम्यान, सद्यस्थितीत ९४८ कोरोनाबाधित असले, तरी ९३ टक्के बाधितांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने मुंबईसाठी दिलासादायक चित्र आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर पालिका आणि राज्य सरकारच्या यशस्वी लढ्यामुळे तीन लाटा यशस्वीरीत्या परतवून लावण्यात यश आले, मात्र जूनअखेर मुंबईत पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णवाढ सुरू झाली होती. मे महिन्यात १२५ पर्यंत खाली आलेली रुग्णसंख्या सप्टेंबरमध्ये थेट दीड हजारांवर गेल्याने पालिकेचे टेन्शन वाढले होते. १५ ऑगस्टपासून २७ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत तब्बल ९ हजार ४९५ रुग्ण वाढले होते; मात्र गणेशोत्सवानंतर मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढ खाली येत गेली आहे.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

मोदींच्या बुलडोझरच्या वक्तव्याला इंडिया आघाडीचा आक्षेप; निवडणूक आयोगाने मोदींवर कारवाई करावी - खर्गे