मुंबई

मुंबईतून कोरोना झाला हद्दपार; दोन वर्षांनंतर गंभीर रुग्णांची शून्य नोंद

पालिका आणि राज्य सरकारच्या यशस्वी लढ्यामुळे तीन लाटा यशस्वीरीत्या परतवून लावण्यात यश आले

प्रतिनिधी

मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत चार लाटा धडकल्या होत्या. चौथी लाट मे महिन्यात धडकली होती; मात्र योग्य उपचार पद्धतीमुळे चौथी लाट रोखण्यात यश आले असून, तब्बल दोन वर्षांनंतर गंभीर रुग्णांची शून्य नोंद झाल्याने मुंबईतून कोरोना हद्दपार झाला आहे. दरम्यान, सद्यस्थितीत ९४८ कोरोनाबाधित असले, तरी ९३ टक्के बाधितांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने मुंबईसाठी दिलासादायक चित्र आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर पालिका आणि राज्य सरकारच्या यशस्वी लढ्यामुळे तीन लाटा यशस्वीरीत्या परतवून लावण्यात यश आले, मात्र जूनअखेर मुंबईत पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णवाढ सुरू झाली होती. मे महिन्यात १२५ पर्यंत खाली आलेली रुग्णसंख्या सप्टेंबरमध्ये थेट दीड हजारांवर गेल्याने पालिकेचे टेन्शन वाढले होते. १५ ऑगस्टपासून २७ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत तब्बल ९ हजार ४९५ रुग्ण वाढले होते; मात्र गणेशोत्सवानंतर मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढ खाली येत गेली आहे.

Iran vs US-Israel War : डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; "४८ तासांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, नाहीतर....

पाळीव मांजर ठेवण्यास कुटुंबीयांचा विरोध; २३ वर्षीय डॉक्टर तरुणीची आत्महत्या

प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत! हुंड्यासाठी पतीकडून पत्नीची हत्या; अवघ्या ४ महिन्यांत संसार उद्ध्वस्त

१ एप्रिलपासून ATM नियमांत बदल! UPI व्यवहारही मोजले जाणार, फ्री लिमिटनंतर २३ रुपये शुल्क

Mumbai : किरकोळ रिक्षा रांगेतील वादातून मुलींवर जमावाचा हल्ला; मालाडमध्ये ५ जण अटकेत