मुंबई

दहिसर टोल नाका आता २० मीटर पुढे; वाहतूक सुरळीत झाल्याचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा

मुंबईतील वाहनचालकांना आश्चर्याचा धक्का देत दहिसर टोल नाका २० मीटर पुढे हलवण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याला वाहतूककोंडी कमी करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हटले असले, तरी रोजच्या प्रवासात अडकणाऱ्या नागरिकांमध्ये या किरकोळ बदलामुळे नाराजी आणि संताप पसरला आहे.

Swapnil S

पूजा मेहता/मुंबई

मुंबईतील वाहनचालकांना आश्चर्याचा धक्का देत दहिसर टोल नाका २० मीटर पुढे हलवण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याला वाहतूककोंडी कमी करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हटले असले, तरी रोजच्या प्रवासात अडकणाऱ्या नागरिकांमध्ये या किरकोळ बदलामुळे नाराजी आणि संताप पसरला आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात बदलाची अपेक्षा होती.

गेल्या काही महिन्यांपासून सरनाईक नागरिकांना आश्वासन देत होते की, दहिसर टोल नाका हलवून मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावरील प्रचंड कोंडी कमी केली जाईल. यासाठी त्यांनी एमएसआरडीसी आणि एनएचएआयला वर्सोवा पुलाजवळ नवीन ठिकाणांचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते.

मात्र महामार्गालगतच्या गावकऱ्यांनी टोल नाका वसई-विरार किंवा मीरा-भाईंदर हद्दीत हलवण्यास तीव्र विरोध केला.

Mumbai : क्रीडा भवनाच्या जागेवर नवे सभागृह; नव्या पालिका सभागृहासाठी भाजपची चाचपणी सुरू, जागेसाठी सरकारची मंजुरी आवश्यक

Mumbai : कालिदास स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील सक्तीच्या कारवाईला स्थगिती; हायकोर्टाने BMC ला फटकारले

Mumbai : सेवानिवृत्त अधिकारीच मागच्या दाराने सल्लागार म्हणून येतात; स्थायी समितीत गणेश खणकर यांचा आरोप

अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांनी अचानक पद सोडले

Mumbai : सीएसएमटी येथील फलाट विस्तारासाठी दहा दिवसांचा ब्लॉक; अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या दादर व ठाणे येथेच थांबणार