मुंबई

दहिसर टोल नाका आता २० मीटर पुढे; वाहतूक सुरळीत झाल्याचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा

मुंबईतील वाहनचालकांना आश्चर्याचा धक्का देत दहिसर टोल नाका २० मीटर पुढे हलवण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याला वाहतूककोंडी कमी करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हटले असले, तरी रोजच्या प्रवासात अडकणाऱ्या नागरिकांमध्ये या किरकोळ बदलामुळे नाराजी आणि संताप पसरला आहे.

Swapnil S

पूजा मेहता/मुंबई

मुंबईतील वाहनचालकांना आश्चर्याचा धक्का देत दहिसर टोल नाका २० मीटर पुढे हलवण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याला वाहतूककोंडी कमी करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हटले असले, तरी रोजच्या प्रवासात अडकणाऱ्या नागरिकांमध्ये या किरकोळ बदलामुळे नाराजी आणि संताप पसरला आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात बदलाची अपेक्षा होती.

गेल्या काही महिन्यांपासून सरनाईक नागरिकांना आश्वासन देत होते की, दहिसर टोल नाका हलवून मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावरील प्रचंड कोंडी कमी केली जाईल. यासाठी त्यांनी एमएसआरडीसी आणि एनएचएआयला वर्सोवा पुलाजवळ नवीन ठिकाणांचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते.

मात्र महामार्गालगतच्या गावकऱ्यांनी टोल नाका वसई-विरार किंवा मीरा-भाईंदर हद्दीत हलवण्यास तीव्र विरोध केला.

Bihar Election Results 2025 Live Updates: एनडीए २०० च्या पार; "ही ज्ञानेश कुमार यांची जादू"; काँग्रेसच्या भूपेश बघेल यांची टीका

Assembly Bypolls Result 2025 : अंतापाठोपाठ जुबली हिल्समध्येही काँग्रेसचा दमदार विजय; बघा अन्य ६ जागांवर कोणाची बाजी?

सुवर्णकाळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन; ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Red Fort Blast : दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी मोठी कारवाई; मास्टरमाईंडचे घर सुरक्षा दलाने उडवले

महाराष्ट्रातील रस्ते की मृत्यूचा सापळा? ६ वर्षात अपघातात ९५,७२२ जणांनी गमावला जीव, सर्वाधिक मृत्यू कोणत्या जिल्ह्यात?