मुंबई

बारमालकांकडून खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराला अटक

नवशक्ती Web Desk

मुंबई : बारमालकांना खंडणीसाठी धमकी देणाऱ्या जयेश नंदू सावंत नावाच्या एका तोतया पत्रकाराला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. जयेश हा एका नामांकित न्यूज चॅनेलचा प्रतिनिधी असल्याची बतावणी करून बार मालकांना धमकी देऊन त्यांच्याकडे खंडणीची मागणी करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गणेश लिंगप्पा अल्लवा यांचे विलेपार्ले येथे कॅम्पस आणि माटुंगा येथे तंदूर नावाचे बार अँड रेस्ट्रॉरंट आहेत. जयेशने त्यांच्या मॅनेजरला फोन करून तुमचा बार रात्रीपर्यंत सुरू असल्याचे व्हिडियो चित्रीकरण माझ्याकडे असल्याचे सांगून खंडणीसाठी धमकी दिली होती. सुरुवातीला त्याला ५५ हजार रुपये दिल्यानंतर जयेशने पुन्हा पैशांची मागणी केली. अखेर त्यांनी विलेपार्ले पोलिसांना घडलेला प्रकार सांगून जयेश सावंतविरुद्ध तक्रार केली होती.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस