मुंबई

लसूण ४०० रुपये किलो

कांदा व टोमॅटोच्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे किचनचे बजेट वाढले. काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे दर २०० रुपये किलोवर पोहोचले होते.

नवशक्ती Web Desk

मुंबई : गेले काही महिने देशात खाद्यपदार्थांचे दर वाढत आहेत. टोमॅटोचे दर वाढल्याने सर्वसामान्य माणसांच्या तोंडचे पाणी पळाले. ते कमी होऊ लागल्यानंतर कांदा महाग झाला, आता लसणाचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. लसूण ४०० रुपये किलोवर गेला आहे.

दरवर्षी डिसेंबरमध्ये लसण्याच्या किमती वाढत असतात. मात्र, यंदा लसणाच्या दरातील वाढ ही असामान्य आहे. गेल्या सहा आठवड्यांत लसणाचे दर दुप्पट झाले आहेत. लसणाचा पुरवठा कमी झाल्याने ही दरवाढ झाली. मध्य प्रदेश, राजस्थान व महाराष्ट्रात लसणाचे उत्पादन होते.

कांदा व टोमॅटोच्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे किचनचे बजेट वाढले. काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे दर २०० रुपये किलोवर पोहोचले होते. त्यानंतर सरकारने स्वस्तात टोमॅटो विक्री सुरू केली. आता टोमॅटोचे दर कमी झाल्यानंतर कांद्याचे दर ७० रुपये किलोवर गेले आहेत. आता सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; १३ वर्षं कोमात असलेल्या हरीश राणाच्या इच्छामरणाला मंजुरी

इराण युद्धाचे चटके आता ठाण्यातील पोळी-भाजी केंद्रांना; वाढलेल्या दराचे फलक बघून सर्वसामान्यांना घाम

CET गैरप्रकार रोखण्यास नवे नियम; परीक्षेदरम्यान बोलल्यास होणार शिक्षा; AI टूल्स व डिजिटल साधनांनाही प्रतिबंध

ठाणे मनपात विविध समितीतील सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या

Mumbai : सेंट्रल पार्कच्या खुल्या जागेचे व्यावसायिकीकरण होणार नाही; सरकारचे सभागृहात आश्वासन